कंत्राटी ग्रामसेवकांना मिळाली तीन वर्षांनंतर रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:15+5:302021-02-05T05:25:15+5:30
खात्यावर वर्ग परताव्याचीदेखील तरतूद अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची संख्या व त्या मानाने ग्रामसेवकांची रिक्त असलेली पदे पाहता त्यांच्यावरील ...

कंत्राटी ग्रामसेवकांना मिळाली तीन वर्षांनंतर रक्कम
खात्यावर वर्ग परताव्याचीदेखील तरतूद
अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची संख्या व त्या मानाने ग्रामसेवकांची रिक्त असलेली पदे पाहता त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी शासनाने सरळ सेवेने ग्रामसेवकांची भरती न करता कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. सलग तीन वर्षे काम करणार्या कंत्राटी ग्रामसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांना सेवेत कायम केले जाते.मागील काही वर्षांपासून राज्य सरकारने आर्थिक परिस्थितीची कारणे देत नोकर भरतीवर बंदी घातल्यामुळे बरीच ग्रामसेवकांची पदे रिक्त होती परिणामी ग्रामपंचायतीच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचे पाहून कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवकाचे नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. अवघे ७,१०० रुपयांवर या ग्रामसेवकाकडून कामे करून घेण्यात येत असून, तत्पूर्वी त्यांची नेमणूक करताना दहा हजार रुपयांची अनामत रक्कम घेतली जाते. विशेष म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक तीन वर्षांनंतर सेवेत कायम झाल्यावर त्यांना परतावा देण्याची तरतूद आहे.
कोट
ग्रामसेवक युनियनच्या प्रयत्नाने कंत्राटी ग्रामसेवकांना त्वरित अर्ज करून जिल्हा परिषदेतील सुरक्षा ठेव परत मिळून देण्यात आली. आता ज्या ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव परत करावयाची आहे ती रक्कम सेवेत कायम झाल्यांतर झेडपी प्रशासनाकडून वेळेवर मिळेल अशी अपेक्षा आहे.
कमलाकर वनवे
जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन
कोट
कंत्राटी ग्रामसेवकांना नियुक्ती दिलेल्यानंतर त्यांच्याकडून दहा हजार रुपये अनामत रक्कम भरून घेतले जाते. ते नियमित सेवेत दाखल झाल्यास संबंधितांना सदरची रक्कम झेडपीकडून परत केली जाते. जिल्ह्यात सेवेत कायम झालेल्यांना आतापर्यंत अनामत रक्क परत करण्यात आली आहे.
दिलीप मानकर
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत
जिल्ह्यातील एकूण ग्रामसेवक ४३५
कंत्राटी ग्रामसेवक ०८
बॉक्स
जिल्ह्यातील१४ तालुक्यात ८४० ग्रामपंचायती असून, यामध्ये ५१० ग्रामसेवक कार्यरत आहेत. जिल्ह्यात २००९ ते आतापर्यंत १२२ कंत्राटी ग्रामसेवकांना जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून अनामत रकमेचा परतावा करण्यात आला आहे. आठ नवीन कंत्राटी ग्रामसेवक गतवर्षी ग्रामपंचायत कंत्राटी म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरण्यात आले त्यांचा परतावा सेवा तीन वर्षांपेक्षा जास्त न झाल्यामुळे परत करण्यात आला नाही.