५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दोन हजार वार्डांची निर्मिती

By Admin | Updated: March 11, 2015 00:27 IST2015-03-11T00:27:27+5:302015-03-11T00:27:27+5:30

जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्यात वाजणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पुर्ण केली आहे़ ....

Construction of 2,000 wards for 552 Gram Panchayats elections | ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दोन हजार वार्डांची निर्मिती

५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दोन हजार वार्डांची निर्मिती

मोहन राऊत अमरावती
जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्यात वाजणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पुर्ण केली आहे़ तब्बल १ हजार ७७३ वार्डाची निर्मीती केली असून प्रारूप मतदार यादी प्रकाशीत केली आहे़ दरम्यान, मंगळवारी शेवटच्या दिवशी चारशे ग्रामपंचायती मधील प्रकाशीत झालेल्या या यादीवर गाव पुढाऱ्यांनी आक्षेप नोंदवीला दरम्यान पुर्णत: सुनावणी सायंकाळ पर्यंत तहसील कार्यालयात करण्यात आली आहे़
लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती निवडणुकीनंतर २० मार्च दरम्यान जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे़ तब्बल ४ हजार ७५८ उमेदवारांना १ हजार ७७३ वार्डातून निवडून द्यायचे आहे़ यासाठी जिल्हा प्रशासनाने या पूर्वीच प्रत्येक ग्रामपंचायती निवडणुकीला पात्र असलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिध्द केली आहे़ ५ मार्च पर्यंत या यादीवर आक्षेप नोंदविणे गरजेचे होते़ जिल्ह्यातील चारशे ग्रामपंचायत मधील राजकीय पुढाऱ्यांनी या प्रारूप यादीवर आक्षेप घेतला आहे़
दरम्यान, सोमवार व मंगळवार या दोन दिवस तहसील कार्यालयात गाव पुढाऱ्यांनी नोंदविलेल्या मतदार यादीत नाव नसणे, तसेच नावा मध्ये चूक असणे, एखाद्या मतदारांचे नाव दुसऱ्या वार्डात समाविष्ट झाले अशा आक्षेपांवर सुनावणी केली आता या यादीत दुरूस्ती करून अंतीम मतदार यादी १४ मार्च रोजी प्रसिध्द होणार आहे़ व २० मार्च दरम्यान ५५२ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची तारीख घोषीत होवून त्वरित त्याच दिवशी आचार संहिता लागणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे आहे.

Web Title: Construction of 2,000 wards for 552 Gram Panchayats elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.