शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सततची नापिकी अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर, हताश शेतकऱ्यानं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 14:52 IST

वरखेड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

तिवसा (अमरावती) : कर्ज व सततची नापिकी, सोबतच गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतीचे अतोनात नुकसान अशा एक ना अनेक संकटांना कंटाळून तालुक्यातील वरखेड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने घरासमोरील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली.

अशोक महादेव आमले (४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कुटुंबप्रमुख असलेल्या अशोक आमले यांच्यावर वृद्ध वडिलांसह पत्नी व दोन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी होती. शेतीव्यतिरिक्त दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. अशातच गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेली. त्यामुळे पदरात काहीच पडले नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गेल्या काही दिवसांपासून ते गावातच हातगाडीवर अंडी विकून कुटुंबाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करायचे.

कुटुंबप्रमुखाचे छत्र हरवल्याने आमले कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी व संततधार पावसामुळे वरखेड मंडळातील सर्वाधिक नुकसान झाले होते. शासनाकडून अद्यापही येथील शेतकऱ्यांना दमडी मिळाली नाही. शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन, उपोषण, रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोरड्या आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAmravatiअमरावती