शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

काँग्रेसचा जनआक्रोश मेळावा : फडणवीस नव्हे ‘फसणवीस’ सरकार - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 19:48 IST

रोज निर्णय फिरविणारे, शेतकरी-जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार ‘फसणवीस सरकार’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केली.

अमरावती : रोज निर्णय फिरविणारे, शेतकरी-जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार ‘फसणवीस सरकार’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. काँग्रेसच्या अमरावती विभागीय जनआक्रोश मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक या नात्याने त्यांनी उपस्थितांमध्ये जान फुंकली. येथील सायन्स कोअर मैदानावर आयोजित या जनआक्रोश मेळाव्याला कार्यकर्ते, शेतकरी आणि सामान्य जनांची भरगच्च उपस्थिती लाभली होती. पाच ते सहा तास हा जनसमुदाय काँग्रेसच्या नेत्यांना ऐकण्यासाठी निर्धारपूर्वक बसला होता. श्रीमंतांच्या मर्सिडिज या आलीशान वाहनासाठी सहा टक्के दराने जीएसटी आकारणारे हे सरकार शेतकºयांच्या ट्रॅक्टरवर २८ टक्के जीएसटी आकारते. विरोधी पक्षनेतेपदी असताना देवेंद्र फडणवीस आघाडी शासनावर खुनाचे गुन्हे नोंदविण्याची मागणी करायचे. आता फडणवीसांच्या राज्यात शेतकºयांच्या १२ हजार आत्महत्या झाल्या आहेत; फडणवीसांविरुद्ध ३०२ कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली नि टाळ्यांच्या प्रतिसादाने श्रोत्यांनी ती उचलून धरली.आमच्या मनात जे आहे, तेच तुमच्याही मनात आहे. शेतकरी, नोकरदार, व्यापारी, महिला सर्वच पिचले गेले आहेत. या सरकारविरुद्ध आता लढा बुलंद करायलाच हवा. तुम्ही आमच्या पाठीवर प्रेमाने फक्त हात ठेवा, लाठ्या-काठ्या खायला आम्हीच समोर राहू, अशी सक्षम नेतृत्वाची ग्वाही त्यांनी यावेळी काँग्रेसच्यावतीने दिली. ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीला वर्ष पूर्ण होत असल्याने काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘बघता काय, खाली उतरा’ या नाºयांनी परिसर दणाणून सोडणारे मोर्चे नागपुरात विधिमंडळावर धडकायलाच हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंचावरून आ. वीरेंद्र जगताप यांनी अपेक्षापूर्तीचे आश्वासनही दिले.  माजी मंत्री वसंत पुरके, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. यशोमती ठाकूर, आ. नसीम खान, महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांचीही यावेळी प्रभावी भाषणे झाली. मंचावर विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, संजय खोडके, केवलराम काळे, किशोर बोरकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. अमित झनक, आ. राहुल बोंद्रे, आ. नसीम खान, दिलीप सरनाईक, वजाहत मिर्झा, हिदायत पटेल, अनंत घारड, सुधाकर गणगणे, नरेशचंद्र ठाकरे, अजहर हुसेन आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बबलू देशमुख, संचालन आ. जगताप आणि आभार प्रदर्शन नितीन गोंडाणे यांनी केले.क्षणात कर्जमाफी - पृथ्वीराज चव्हाणआमचे सरकार असताना आम्ही शेतक-यांना क्षणात कर्जमाफी दिली. हात पसरायला लावून शेतकºयांचा अपमान केला नाही. जीएसटीची कल्पना काँग्रेसची होती. काँग्रेस सत्तेत असताना मोदींनी विरोध केला. ते सत्तेत आल्यावर जगातील अनेक देशांमध्ये असा कर असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि काँग्रेसचा योग्य तयारीचा सल्ला धुडकावून घिसाडघाईने जीएसटी लागू केला. त्यामुळे मनमोहनसिंग यांनी भाकित केल्याप्रमाणे दोन टक्क््यांनी विकासदर घसरला, अशा शब्दांत मोदी सरकारचे अपयश पृथ्वीराज चव्हाण यांनी उघड केले. ये नोट मोदी की नही थी - मोहन प्रकाश झा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जुनी नोट दाखवत मोदी म्हणाले होते, ‘आज रात १२ बजे से यह नोट कागज का टुकडा बन जाएगी.’ अविचारी निर्णयाने क्षणात कागदात रूपांतरित केलेल्या त्या नोटा नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या नव्हत्या. त्या होत्या शेतकºयांच्या, कष्टकºयांच्या, असा शाब्दिक वार महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश झा यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या नीतीवर केली. हे सरकार ‘शहा-हुकूमशहां’चे आहे, असा उच्चार करताच श्रोत्यांनी दाद दिली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण