शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

काँग्रेसचा जनआक्रोश मेळावा : फडणवीस नव्हे ‘फसणवीस’ सरकार - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 19:48 IST

रोज निर्णय फिरविणारे, शेतकरी-जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार ‘फसणवीस सरकार’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केली.

अमरावती : रोज निर्णय फिरविणारे, शेतकरी-जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार ‘फसणवीस सरकार’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. काँग्रेसच्या अमरावती विभागीय जनआक्रोश मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक या नात्याने त्यांनी उपस्थितांमध्ये जान फुंकली. येथील सायन्स कोअर मैदानावर आयोजित या जनआक्रोश मेळाव्याला कार्यकर्ते, शेतकरी आणि सामान्य जनांची भरगच्च उपस्थिती लाभली होती. पाच ते सहा तास हा जनसमुदाय काँग्रेसच्या नेत्यांना ऐकण्यासाठी निर्धारपूर्वक बसला होता. श्रीमंतांच्या मर्सिडिज या आलीशान वाहनासाठी सहा टक्के दराने जीएसटी आकारणारे हे सरकार शेतकºयांच्या ट्रॅक्टरवर २८ टक्के जीएसटी आकारते. विरोधी पक्षनेतेपदी असताना देवेंद्र फडणवीस आघाडी शासनावर खुनाचे गुन्हे नोंदविण्याची मागणी करायचे. आता फडणवीसांच्या राज्यात शेतकºयांच्या १२ हजार आत्महत्या झाल्या आहेत; फडणवीसांविरुद्ध ३०२ कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली नि टाळ्यांच्या प्रतिसादाने श्रोत्यांनी ती उचलून धरली.आमच्या मनात जे आहे, तेच तुमच्याही मनात आहे. शेतकरी, नोकरदार, व्यापारी, महिला सर्वच पिचले गेले आहेत. या सरकारविरुद्ध आता लढा बुलंद करायलाच हवा. तुम्ही आमच्या पाठीवर प्रेमाने फक्त हात ठेवा, लाठ्या-काठ्या खायला आम्हीच समोर राहू, अशी सक्षम नेतृत्वाची ग्वाही त्यांनी यावेळी काँग्रेसच्यावतीने दिली. ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीला वर्ष पूर्ण होत असल्याने काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘बघता काय, खाली उतरा’ या नाºयांनी परिसर दणाणून सोडणारे मोर्चे नागपुरात विधिमंडळावर धडकायलाच हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंचावरून आ. वीरेंद्र जगताप यांनी अपेक्षापूर्तीचे आश्वासनही दिले.  माजी मंत्री वसंत पुरके, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. यशोमती ठाकूर, आ. नसीम खान, महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांचीही यावेळी प्रभावी भाषणे झाली. मंचावर विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, संजय खोडके, केवलराम काळे, किशोर बोरकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. अमित झनक, आ. राहुल बोंद्रे, आ. नसीम खान, दिलीप सरनाईक, वजाहत मिर्झा, हिदायत पटेल, अनंत घारड, सुधाकर गणगणे, नरेशचंद्र ठाकरे, अजहर हुसेन आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बबलू देशमुख, संचालन आ. जगताप आणि आभार प्रदर्शन नितीन गोंडाणे यांनी केले.क्षणात कर्जमाफी - पृथ्वीराज चव्हाणआमचे सरकार असताना आम्ही शेतक-यांना क्षणात कर्जमाफी दिली. हात पसरायला लावून शेतकºयांचा अपमान केला नाही. जीएसटीची कल्पना काँग्रेसची होती. काँग्रेस सत्तेत असताना मोदींनी विरोध केला. ते सत्तेत आल्यावर जगातील अनेक देशांमध्ये असा कर असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि काँग्रेसचा योग्य तयारीचा सल्ला धुडकावून घिसाडघाईने जीएसटी लागू केला. त्यामुळे मनमोहनसिंग यांनी भाकित केल्याप्रमाणे दोन टक्क््यांनी विकासदर घसरला, अशा शब्दांत मोदी सरकारचे अपयश पृथ्वीराज चव्हाण यांनी उघड केले. ये नोट मोदी की नही थी - मोहन प्रकाश झा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जुनी नोट दाखवत मोदी म्हणाले होते, ‘आज रात १२ बजे से यह नोट कागज का टुकडा बन जाएगी.’ अविचारी निर्णयाने क्षणात कागदात रूपांतरित केलेल्या त्या नोटा नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या नव्हत्या. त्या होत्या शेतकºयांच्या, कष्टकºयांच्या, असा शाब्दिक वार महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश झा यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या नीतीवर केली. हे सरकार ‘शहा-हुकूमशहां’चे आहे, असा उच्चार करताच श्रोत्यांनी दाद दिली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण