जिल्हा परिषदेच्या चार कोटींच्या कामांवर गंडांतर
By Admin | Updated: November 18, 2014 22:47 IST2014-11-18T22:47:28+5:302014-11-18T22:47:28+5:30
आघाडी शासनाने निवडणुकीपूर्वी घाईने मंजूर केलेली जिल्ह्यातील ४ कोटी ७२ लाखांची विकास कामे तातडीने थांबविण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी

जिल्हा परिषदेच्या चार कोटींच्या कामांवर गंडांतर
जितेंद्र दखने - अमरावती
अमरावती : आघाडी शासनाने निवडणुकीपूर्वी घाईने मंजूर केलेली जिल्ह्यातील ४ कोटी ७२ लाखांची विकास कामे तातडीने थांबविण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे. ही सर्व कामे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाशी संबंधित असून आतापर्यंत यातील वर्कआॅर्डर न मिळालेली ३ कोटींची कामे परत पाठविण्यात आली आहेत. वर्कआॅर्डर मिळालेल्या कामांचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत मागविण्यात आला होता. जी कामे अद्याप सुरू नाहीत तीही थांबविली जाणार आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना खुष करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व माजी पालकमंत्र्यांनी जाता जाता जिल्ह्यात ४.७२ कोटींची विकास कामे मंजूर केली होती. निवडणुकीनंतर पुन्हा आघाडी सरकार येईल आणि हिवाळी अधिवेशनात या कामांना निधी मंजूर करून घेऊन तो डिसेंबरमध्ये उपलब्ध होईल, असा कयास त्यावेळी होता. प्रत्यक्षात आघाडी सरकारची सत्ता गेली आणि भारतीय जनता पक्ष सत्तेवर आले. माजी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी घाईघाईने मंजूर केलेली कामे आता अडचणीत आली आहेत. आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कामे करण्यासाठी तब्बल पाच कोटी रूपये लागणार असल्याने ही कामे निधीअभावी थांबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. जिल्ह्यात ४.७२ कोटीची कामे अंतिम टप्प्यात मंजूर केली होती.