पूर्णामायवर जमली अपंगाची मांदीयाळी
By Admin | Updated: February 7, 2016 01:07 IST2016-02-07T01:07:09+5:302016-02-07T01:07:09+5:30
टोंगलापूर येथील पूर्णानदीच्या काठी वसलेल्या पूर्णामाय अपंग पुनर्वसन केंद्रात अपंगांची मांदीयाळी जमली होती.

पूर्णामायवर जमली अपंगाची मांदीयाळी
२५१ रक्तदात्यांचा सहभाग : १५०० अपंगांना साहित्य वाटप
चांदूरबाजार : टोंगलापूर येथील पूर्णानदीच्या काठी वसलेल्या पूर्णामाय अपंग पुनर्वसन केंद्रात अपंगांची मांदीयाळी जमली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५०० अपंग बांधवांना कृत्रिम अवयव तसेच साहित्य वाटप करण्यात आले.
राज्यातील अपंगांच्या समस्या पोटतिडकीने शासनासमोर मांडणारा जमिनीवरचा नेता म्हणून ख्यातीप्राप्त आमदार बच्चू कडू यांचा अभीनव आंदोलनामुळे अपंगांना आजपर्यंत १७ शासन निर्णय पारित होवू शकले. त्यात अपंगांना ३ टक्के निधी, ३ टक्के गाळेवाटप, शासकीय सेवेतील ३ टक्के जागा तातडीने भरणे, संजय गांधी निराधार योजनेतील मिळणारे ६०० रुपये १००० रुपयांपर्यंत वाढविणे तसेच अपंगांना विनाअट घरकुल मिळण्याबाबत निर्णयाचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर प्रमाणेच अमरावती येथे सुद्धा जागतिक दर्जाचे फुडपार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते प्रहार अपंग क्रांती आंदोलन या पुस्तकाचे विमोचन सुद्धा करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी स्वत: अंध-अपंगाचा वेदना जाणून घेत साहित्य वाटप करीत होते. राज्यभरातून आलेले महीला-पुरुष अपंगांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. सोबतच कृषी पर्यटन केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता सत्यशोधक बहुुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा नयना कडू, सचिव राहुल म्हाला, पल्लवी कडू, रवी सूर्यवंशी, विनोद जवंजाळ, पवन वाठ, मंगेश देशमुख, प्रशांत देवतळे, गजू मोहोड, बाल्या ठाकरे, अनिल खुळे, चंद्रशेखर मोहोड, संतोष किटुकले, वसू महाराज यांच्यासह शेकडो प्रहार कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)