रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्याचे जमीन हस्तांतरण पूर्ण
By Admin | Updated: May 24, 2014 23:12 IST2014-05-24T23:12:29+5:302014-05-24T23:12:29+5:30
बडनेरा येथील प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्यासाठी लागणार्या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. येत्या जुलै महिन्यात या कारखान्याचे भूमिपूजन होण्याचे संकेत आहेत.

रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्याचे जमीन हस्तांतरण पूर्ण
अमरावती : बडनेरा येथील प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्यासाठी लागणार्या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. येत्या जुलै महिन्यात या कारखान्याचे भूमिपूजन होण्याचे संकेत आहेत. बडनेर्यातील पाच बंगला परिसरातील निर्माणाधिन रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्याची जबाबदारी पटना येथील रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे सोपविली आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या महत्प्रयासाने मंजूर झालेला हा कारखाना २४७ कोटी रूपये खर्च करून पूर्णत्वास येणार आहे. १९६ एकर जमिनीवर हा कारखाना निर्माण होणार असून जमिन हस्तांतरणासाठी १५ कोटी ३२ लाख रूपये खर्च झाले आहेत. यासाठी ६४ शेतकर्यांची जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. कारखान्यासाठी २३ घरे तर १0९ एवढी लोकसंख्या बाधित झाली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या शेतकर्यांच्या जमिनीमध्ये मौजा टाकळी (खुर्द) येथील ७२.१७ हेक्टर, मौजा बडनेरा २.९६ हेक्टर तर मौजा दुर्गापूर २.७२ हेक्टर इतक्या जमिनीचा समावेश आहे. या कारखान्यासाठी जमीन देण्यास प्रारंभी शेतकर्यांनी विरोध दर्शविला. अखेर प्रशासनाने सामोपचाराने तोडगा काढून रेल्वेला जमीन हस्तातंरणाची प्रक्रिया पूर्ण करून दिली. त्यामुळे रेल्वे वॅगन कारखाना पूर्णत्वास जाईल.