शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचाच ड्रिम प्रोजेक्ट ‘लाॅकडाउन’ मेळघाटात टेलिमेडिसिन सेवा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 14:50 IST

आदिवासींची थट्टा कायम : म्हणे, तीन वर्षांत तपासले केवळ ३६७ रुग्ण

चिखलदरा (अमरावती) : देशातील पहिले डिजिटल गाव हरिसाल. आदिवासी बांधवांना नानाविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा दावा केंद्रच नव्हे तर राज्य शासनाच्या वतीने मोठ्या दिमाखात करण्यात आला होता. मात्र, २०१६ साली सुरू करण्यात आलेली टेलिमेडिसिन सेवा अवघ्या तीन वर्षांतच गुंडाळण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट निधीअभावी शासकीय लालफीतशाहीत अडकला अन् बंद झाला. मेळघाटात आदिवासी बांधवांच्या जिवावर अनेक प्रयोग केले जातात. एक प्रयोग सुरू करायचा आणि अर्ध्यावर तो सोडून द्यायचा. गेल्या कित्येक वर्षांपासून हा खेळ मेळघाटात सुरू आहे.

देशात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना मेळघाटात नेटवर्कअभावी टेलिमेडिसिन (व्हिडीओ कॉन्फरन्स) केंद्र बंद पडले आहे. दुसरीकडे ई- संजीवनी आणि महात्मा फुले योजनेतून रुग्णांना लाभ आणि तपासणीचा उपक्रम राबविला जात आहे. मेळघाटातील आदिवासी रुग्णांना मुंबई, पुणे आदी ठिकाणाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची मदत व्हावी वेळेवर योग्य पद्धतीचा उपचार व्हावा यासाठी सेमाडोह चिखलदरा, हरिसाल, धारणी या ठिकाणी टेलिमेडिसिन सेवा सुरू करण्यात आली.

करार संपला अन् लागले ग्रहण

सेमाडोह येथे १६ जानेवारी २०१५ रोजी सुरू करण्यात आलेली सेवा अवघ्या सात महिन्यांतच मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने बंद झाली, तर २०१६ ला हरिसाल येथे मुख्यमत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन केंद्र थाटण्यात आले. २०१९ मध्ये मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीचा करार संपला आणि या सेवेलाही ग्रहण लागले. विशेष म्हणजे तीन वर्षांत केवळ ३६७ रुग्णांनाच या सेवेचा लाभ मिळाला.

ई- संजीवनी हातात, महात्मा फुलेंचा लाभ

मेळघाटात नेटवर्कची समस्या असल्याने कंपन्यांनी गाशा गुंडाळला. आता मोबाइलवर ई- संजीवनी योजनेंतर्गत रुग्णांना ॲप डाउनलोड करून त्यात आजारासंदर्भात माहिती टाकल्यावर उपचार पद्धती सांगितली जाते, तर महात्मा फुले योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यAmravatiअमरावती