शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

मुख्यमंत्र्यांचाच ड्रिम प्रोजेक्ट ‘लाॅकडाउन’ मेळघाटात टेलिमेडिसिन सेवा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 14:50 IST

आदिवासींची थट्टा कायम : म्हणे, तीन वर्षांत तपासले केवळ ३६७ रुग्ण

चिखलदरा (अमरावती) : देशातील पहिले डिजिटल गाव हरिसाल. आदिवासी बांधवांना नानाविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा दावा केंद्रच नव्हे तर राज्य शासनाच्या वतीने मोठ्या दिमाखात करण्यात आला होता. मात्र, २०१६ साली सुरू करण्यात आलेली टेलिमेडिसिन सेवा अवघ्या तीन वर्षांतच गुंडाळण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट निधीअभावी शासकीय लालफीतशाहीत अडकला अन् बंद झाला. मेळघाटात आदिवासी बांधवांच्या जिवावर अनेक प्रयोग केले जातात. एक प्रयोग सुरू करायचा आणि अर्ध्यावर तो सोडून द्यायचा. गेल्या कित्येक वर्षांपासून हा खेळ मेळघाटात सुरू आहे.

देशात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना मेळघाटात नेटवर्कअभावी टेलिमेडिसिन (व्हिडीओ कॉन्फरन्स) केंद्र बंद पडले आहे. दुसरीकडे ई- संजीवनी आणि महात्मा फुले योजनेतून रुग्णांना लाभ आणि तपासणीचा उपक्रम राबविला जात आहे. मेळघाटातील आदिवासी रुग्णांना मुंबई, पुणे आदी ठिकाणाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची मदत व्हावी वेळेवर योग्य पद्धतीचा उपचार व्हावा यासाठी सेमाडोह चिखलदरा, हरिसाल, धारणी या ठिकाणी टेलिमेडिसिन सेवा सुरू करण्यात आली.

करार संपला अन् लागले ग्रहण

सेमाडोह येथे १६ जानेवारी २०१५ रोजी सुरू करण्यात आलेली सेवा अवघ्या सात महिन्यांतच मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने बंद झाली, तर २०१६ ला हरिसाल येथे मुख्यमत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन केंद्र थाटण्यात आले. २०१९ मध्ये मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीचा करार संपला आणि या सेवेलाही ग्रहण लागले. विशेष म्हणजे तीन वर्षांत केवळ ३६७ रुग्णांनाच या सेवेचा लाभ मिळाला.

ई- संजीवनी हातात, महात्मा फुलेंचा लाभ

मेळघाटात नेटवर्कची समस्या असल्याने कंपन्यांनी गाशा गुंडाळला. आता मोबाइलवर ई- संजीवनी योजनेंतर्गत रुग्णांना ॲप डाउनलोड करून त्यात आजारासंदर्भात माहिती टाकल्यावर उपचार पद्धती सांगितली जाते, तर महात्मा फुले योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यAmravatiअमरावती