शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

अमरावतीत ढगफुटी; ३३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 17:46 IST

Amravati : तिवसा तालुक्यात दीडशे हेक्टर शेतजमीन खरडली, १० घरांची पडझड, शेतीपिकांचे प्रचंड नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/तिवसा : जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाने ३३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यांमध्ये पावसाने शतक पार केले.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापूर महसूल मंडळात १४६ मि.मी., धामणगाव १२० मि.मी., अंजनसिंगी १०९.२५ मि.मी., मंगरूळ दस्तगीर १०४.५ मि.मी., भातकुली ८८.७५ मि.मी., तळेगाव दशासर ६८.७५ मि.मी., चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूर, पळसखेड व आमला महसूल मंडळात प्रत्येकी ११७.२५ मि.मी., सातेफळ ११४.७५ मि.मी., घुईखेड ६८.७५ मि.मी., अमरावती तालुक्यातील अमरावती, नवसारी व वडाळी मंडळात प्रत्येकी ८५.५ मि.मी., शिराळा ७३.७५ मि.मी., वलगाव ७३.२५ मि.मी., बडनेरा ६८.२५ मि.मी., माहुली व नांदगाव पेठ ६५ मि.मी., तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळात ७५ मि.मी., कुन्हा ८५ मि.मी., मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर मंडळात ७३.५ मि.मी., अचलपूर तालुक्यातील असदपूर मंडळात ६५ मि.मी., चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा मंडळात ७३.५ मि.मी. भातकुली तालुक्यातील पूर्णानगर मंडळात ७३.७५ मि.मी., आष्टी ७३.२५ मि.मी., भातकुली ७२ मि.मी., आसरा ६८.५ मि.मी., नांदगाव तालुक्यातील दाभा व लोणी मंडळात ६८.२५ मि.मी पावसाची नोंद झाली. 

खोलाड नाल्याच्या पुरात इसमाचा मृत्यू मंगरूळ दस्तगीर : शेतातून परतणारे महादेवराव गाडेकर (६५, रा. पेठ रघुनाथपूर) हे खोलाड नाल्याच्या पुरात वाहत गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पाण्याचा ओढ जास्त असल्याने ते वाहत गेले.

थिलोरी गावात शिरले नाल्याचे पाणीदर्यापूर : तालुक्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांचा पूर शेतात-गावातही शिरला. थिलोरी लखापूर गावातून वाहणाऱ्या नाल्याचे भरून वाहत असल्याने गावात पाणी शिरले. दुसरीकडे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने नाल्यालगत असलेल्या शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. थिलोरी लखापूर गावातून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नाल्याजवळील रहिवासीसुद्धा सतर्क झाले आहेत. थिलोरी गावात पाणी नाल्याचे पाणी दरवर्षी शिरते.

नुकसानाचे तत्काळ पंचनामे करा - अडसडधामणगाव रेल्वे : मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टी व संततधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आ. प्रताप अडसड यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. कृषी सहायक, तलाठी ग्रामसेवक यांची समिती नेमून पंचनामे करावे व जिल्हा प्रशासनाला तात्काळ अहवाल पाठवावा, असे तिन्ही तहसीलदारांना त्यांनी निर्देश दिले. त्याप्रमाणे तिन्ही तालुक्यात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

"दोनही मंडळात उ‌द्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे."- डॉ. मयूर कळसे, तहसीलदार तिवसा.

टॅग्स :Amravatiअमरावती