शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

थकीत देयकांअभावी २२ पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: April 26, 2015 23:54 IST

जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट गडद होत असताना वीज देयकांची थकबाकी असल्यामुळे २२ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत...

फटका : नागरिकांची पाण्यासाठी वणवणअमरावती : जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट गडद होत असताना वीज देयकांची थकबाकी असल्यामुळे २२ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण एक हजार सहाशे पंधरा गावांपैकी १ हजार ५१४ गावांत पाणीपुरवठा योजनांतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक योजना बंद पडल्या आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहेत. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील १ हजार ४८२ गावांमध्येच पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत आहे. वीज देयकांची थकबाकी न भरल्याने जिल्हाभरात २२ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. तर देखभाल दुरुस्तीअभावी १० योजना सुरू नसल्याची माहिती आहे. मेळघाटातील २६ पाणीपुरवठा योजना बंद स्थितीत आहेत. देखभाल दुरूस्ती व थकीत वीज देयकाअभावी २६ योजना बंद पडल्या आहेत. चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील गावांमध्ये ८११ हातपंप व ३०४ सार्वजनिक विहिरींच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र याबाबतीत प्रशासकीय यंत्रणा पाहिजे तशी दखल घेत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. जिल्हाभरात ७ प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना आहेत. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेचे थकीत देयके वर्षोगिणती रखडले आहे. काही योजना देखभाल दुरुस्तीअभावी बंद पडल्या आहेत. - श्वेता बॅनर्जी,कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग.