महामार्गावर चक्काजाम

By Admin | Updated: December 3, 2014 22:41 IST2014-12-03T22:41:11+5:302014-12-03T22:41:11+5:30

नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर महामार्गावर बुधवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.

Climb on the highway | महामार्गावर चक्काजाम

महामार्गावर चक्काजाम

संभाजी ब्रिगेडचे आंदोलन : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक
अमरावती : नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर महामार्गावर बुधवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करुन शासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
काही वर्षांपासून अतिवृष्टी, दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतीच्या अडचणीपायी अनेक शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत; तथापि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवा यासाठी संभाजी ब्रिगेडने लढा उभारला आहे. कापसाला प्रति क्विंटल ७ हजार रुपये तर सोयाबीनला ५ हजार रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांना १२ तास पूर्ण व्होल्टेजचा वीज पुरवठा द्यावा, विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. या मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.

Web Title: Climb on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.