महामार्गावर चक्काजाम
By Admin | Updated: December 3, 2014 22:41 IST2014-12-03T22:41:11+5:302014-12-03T22:41:11+5:30
नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर महामार्गावर बुधवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.

महामार्गावर चक्काजाम
संभाजी ब्रिगेडचे आंदोलन : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक
अमरावती : नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर महामार्गावर बुधवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करुन शासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
काही वर्षांपासून अतिवृष्टी, दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतीच्या अडचणीपायी अनेक शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत; तथापि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवा यासाठी संभाजी ब्रिगेडने लढा उभारला आहे. कापसाला प्रति क्विंटल ७ हजार रुपये तर सोयाबीनला ५ हजार रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांना १२ तास पूर्ण व्होल्टेजचा वीज पुरवठा द्यावा, विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. या मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.