शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

अमरावतीत अवेळी पाणी; झोपेचे खोबरे! नियोजनात मजीप्र 'फेल', नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 15:50 IST

अपुरा पुरवठा, अनियोजित वेळी येणारे नळ यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा पुरता विचका झाल्याचा अनुभव अमरावतीकरांना येत आहे.

मनीष तसरे

अमरावती : शहराची तहान भागविणारा एकमेव तलाव म्हणजे माेर्शी येथील अप्पर वर्धा धरण होय. मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने नलदमयंती तलाव हा शंभर टक्के पूर्ण भरला होता. याच धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सद्य:स्थितीत धरणात फक्त पन्नास टक्केच पाणी शिल्लक आहे. हे पाणी शहराची तहान भागविण्याकरिता पुरेसे असले तरी अपुरा पुरवठा, अनियोजित वेळी येणारे नळ यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा पुरता विचका झाल्याचा अनुभव अमरावतीकरांना येत आहे.

अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा असल्याने पाण्याची गरज जास्त भासत आहे. मात्र शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे तर काही ठिकाणी दोन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित केला जात नसल्याने लोकांची प्रचंड नाराजी आहे. पूर्ण एक तासही नळाला पाणी येत नसल्याचे शहरातील महावीर नगर, नरसिंह कॉलनी, मच्छगंधा कॉलनी तसेच बडनेरा येथील आठवडी बाजार, अशोक नगर, राहुल नगर, नवी वस्ती बडनेरा या लोकवस्तीत पिण्याचे पाणी कमी दाबाने मिळते.

२०२३ मधील नियोजन आत्ताच

अमरावती शहर हे ड वर्ग महानगरपालिका असून, सध्याची लोकसंख्या ही जवळपास ८ लक्ष इतकी आहे. शहरापासून ५५ किलोमीटर लांब असलेल्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयातून पाणीपुरवठा करणारी योजना ही १९९४ मधील आहे. त्यानंतर २०१६-२०१७ मध्ये अमृत अभियान अंतर्गत अमरावती शहराकरिता २०३३ ची लोकसंख्या ८,८३,९५४ इतकी गृहीत धरून प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र ती स्थिती आजच निर्माण झाली आहे.

पुन्हा आंदोलन ?

शिदोरी उशाशी अन् माणसे उपाशी अशी स्थिती अमरावतीकरांवर ओढवली आहे. अमरावती शहराची भरभराट होत आहे. टोलेगंज इमारती उभ्या होत आहेत. या शहरात वास्तव्यासाठी लोक उत्सूक आहेत. पाण्यासाठी मात्र, आंदोलन करायचे का, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे.

उन्हाळा असल्याने पाण्याची वाढली मागणी

अमरावती शहरात पाणीपुरवठा करण्याकरिता अप्पर झोन व लोअर झोन अशी विभागणी केली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन केले जात आहे. पाण्याचे प्रेशर काही ठिकाणी कमी आहे. शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मोर्शी येथील अप्पर धरणावर नियमित ४ पंपाव्दारे पाणी घेतले जात आहे. मात्र मागणी वाढल्याने एक पंप पुढील आठवड्यात सुरू होईल. मात्र पाईपलाईन जुनी असल्याने त्यावर प्रेशर येऊ न म्हणून काळजी घेत आहे.

-विवेक सोळंके, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

आमच्याकडे नळाला पिण्याचे पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. आले तरी पूर्ण पाणीसुद्धा भरून होत नाही तोच पाणी जाते. पाणी येईल म्हणून कोणाला तरी घरीच थांबावे लागते.

- रेखा मानकर

नळाला पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. कधी रात्री ११ तर कधी १२ वाजता पाणी येते. त्यामुळे कामावरून आल्यानंतर रात्री पाण्याची वाट पाहावी लागते. पूर्ण भरून होण्याआधीच ते जाते. आम्ही अनेकदा तक्रारदेखील केली आहे.

- शिवंगी वेळूरकर

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईAmravatiअमरावतीGovernmentसरकार