शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

शासकीय कार्यालयांमध्ये एक तास जेवणासाठी पण नागरिकांना राहावे लागते दोन तास ताटकळत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:29 IST

Amravati : कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कालावधीत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विविध कामानिमित्त आलेले नागरिक यांना ताटकळत राहावे लागू नये, यासाठी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची वेळ निश्चित केलेली आहे. मात्र, बहुतांश शासकीय कार्यालयात भोजन अवकाशात कामासाठी आलेल्या नागरिकांना एक ते दीड तास प्रतीषेतच राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील असो की, शहरातील नागरिकांना विविध कामानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयात जावे लागते. यात जर त्यांना पोहोचण्यास उशिर झाला. दुपारचे एक वाजले की याठिकाणी दुपारच्या जेवणाची वेळ होते. अनेक ठिकाणी टेबल ओढले जातात. एकमेकांची प्रतीक्षा केली जाते व नंतर जेवन यामध्ये किमान तासभराचा वेळ जातो. काही ठिकाणी जरा जास्तच वेळ जातो.

सरकारी कार्यालयात वेळापत्रकाचा अभावसरकारी कार्यालयांमध्ये बहुतेक ठिकाणी कार्यालयीन कामकाजाची वेळ लिहिलेली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना दुपारी थोडा जरी उशीर झाला, तर लंच टाइमचा फटका बसतोच. त्यांना तासभर प्रतीक्षेत राहावे लागते.

जेवणाची वेळ दीड ते दोनचीशासकीय कार्यालयांमध्ये दुपारी एक ते दोन दरम्यान अर्धा तासाची वेळ ही जेवणाची निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात अनेक कार्यालयात दुपारी अडीचनंतरच जेवन अवकाश झाल्यानंतर कामकाज सुरू होत असल्याचे दिसून येते.

सर्वसामान्यांची अडचणअनेकदा ग्रामीण भागातून कामानिमित्त जिल्हा कार्यालयात येणारे नागरिक दुपारी १ च्या आत पोहचू शकत नाही. त्यामुळे त्यांना प्रतीक्षेत थांबावे लागते.

प्रत्यक्षात कर्मचारी दोन तास गायबकाही कर्मचारी जेवणाचा डब्बा आणतात, तर काही कर्मचारी दुपारी जेवण्यासाठी घरी जातात. दुपारी बाहेर जाण्यासाठी बायोमेट्रीकची अडचण नसल्याने जरा फुरसतनेच कार्यालयात येतात. काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन प्रचंड काम असते. सायंकाळी कार्यालय बंद झाल्यानंतर तासभर तरी काम सुरूच असल्याचे दिसून येते. अनेकदा सुटीच्या दिवशीही ते ऑफीसला येतात, त्यामुळे कामातून वेळ मिळाल्यानंतर ते जेवण करताना दिसतात. ज्या कार्यालयात बायोमेट्रीक मशीन नाही, तिथे कार्यालयात येण्यापासून ते दुपारचे जेवण व सायंकाळी घरी जाण्याची वेळ कधीही पाळल्या जात नसल्याचे दिसून येते. याकडे तेथीळ विभागप्रमुखांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

"सहकार विभागात कामानिमित्त आलो असता, दुपारी अडीचपर्यंत संबंधित कर्मचारी टेबलवर नव्हते. जेवण्यासाठी घरी गेल्याचे सांगण्यात आले."- प्रशांत वानखडे, अमरावती

"जिल्हा परिषदेत कामानिमित्त आलो असता दुपारी लंच टाइम होता. त्यानंतर तीनपर्यंत संबंधित कर्मचारी आलेच नाही. कृषी विभागातही असाच अनुभव आहे."- गणेश ठाकरे, मोर्शी

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकार