शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

शासकीय कार्यालयांमध्ये एक तास जेवणासाठी पण नागरिकांना राहावे लागते दोन तास ताटकळत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:29 IST

Amravati : कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कालावधीत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विविध कामानिमित्त आलेले नागरिक यांना ताटकळत राहावे लागू नये, यासाठी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची वेळ निश्चित केलेली आहे. मात्र, बहुतांश शासकीय कार्यालयात भोजन अवकाशात कामासाठी आलेल्या नागरिकांना एक ते दीड तास प्रतीषेतच राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील असो की, शहरातील नागरिकांना विविध कामानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयात जावे लागते. यात जर त्यांना पोहोचण्यास उशिर झाला. दुपारचे एक वाजले की याठिकाणी दुपारच्या जेवणाची वेळ होते. अनेक ठिकाणी टेबल ओढले जातात. एकमेकांची प्रतीक्षा केली जाते व नंतर जेवन यामध्ये किमान तासभराचा वेळ जातो. काही ठिकाणी जरा जास्तच वेळ जातो.

सरकारी कार्यालयात वेळापत्रकाचा अभावसरकारी कार्यालयांमध्ये बहुतेक ठिकाणी कार्यालयीन कामकाजाची वेळ लिहिलेली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना दुपारी थोडा जरी उशीर झाला, तर लंच टाइमचा फटका बसतोच. त्यांना तासभर प्रतीक्षेत राहावे लागते.

जेवणाची वेळ दीड ते दोनचीशासकीय कार्यालयांमध्ये दुपारी एक ते दोन दरम्यान अर्धा तासाची वेळ ही जेवणाची निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात अनेक कार्यालयात दुपारी अडीचनंतरच जेवन अवकाश झाल्यानंतर कामकाज सुरू होत असल्याचे दिसून येते.

सर्वसामान्यांची अडचणअनेकदा ग्रामीण भागातून कामानिमित्त जिल्हा कार्यालयात येणारे नागरिक दुपारी १ च्या आत पोहचू शकत नाही. त्यामुळे त्यांना प्रतीक्षेत थांबावे लागते.

प्रत्यक्षात कर्मचारी दोन तास गायबकाही कर्मचारी जेवणाचा डब्बा आणतात, तर काही कर्मचारी दुपारी जेवण्यासाठी घरी जातात. दुपारी बाहेर जाण्यासाठी बायोमेट्रीकची अडचण नसल्याने जरा फुरसतनेच कार्यालयात येतात. काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन प्रचंड काम असते. सायंकाळी कार्यालय बंद झाल्यानंतर तासभर तरी काम सुरूच असल्याचे दिसून येते. अनेकदा सुटीच्या दिवशीही ते ऑफीसला येतात, त्यामुळे कामातून वेळ मिळाल्यानंतर ते जेवण करताना दिसतात. ज्या कार्यालयात बायोमेट्रीक मशीन नाही, तिथे कार्यालयात येण्यापासून ते दुपारचे जेवण व सायंकाळी घरी जाण्याची वेळ कधीही पाळल्या जात नसल्याचे दिसून येते. याकडे तेथीळ विभागप्रमुखांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

"सहकार विभागात कामानिमित्त आलो असता, दुपारी अडीचपर्यंत संबंधित कर्मचारी टेबलवर नव्हते. जेवण्यासाठी घरी गेल्याचे सांगण्यात आले."- प्रशांत वानखडे, अमरावती

"जिल्हा परिषदेत कामानिमित्त आलो असता दुपारी लंच टाइम होता. त्यानंतर तीनपर्यंत संबंधित कर्मचारी आलेच नाही. कृषी विभागातही असाच अनुभव आहे."- गणेश ठाकरे, मोर्शी

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकार