शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांमध्ये एक तास जेवणासाठी पण नागरिकांना राहावे लागते दोन तास ताटकळत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:29 IST

Amravati : कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कालावधीत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विविध कामानिमित्त आलेले नागरिक यांना ताटकळत राहावे लागू नये, यासाठी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची वेळ निश्चित केलेली आहे. मात्र, बहुतांश शासकीय कार्यालयात भोजन अवकाशात कामासाठी आलेल्या नागरिकांना एक ते दीड तास प्रतीषेतच राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील असो की, शहरातील नागरिकांना विविध कामानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयात जावे लागते. यात जर त्यांना पोहोचण्यास उशिर झाला. दुपारचे एक वाजले की याठिकाणी दुपारच्या जेवणाची वेळ होते. अनेक ठिकाणी टेबल ओढले जातात. एकमेकांची प्रतीक्षा केली जाते व नंतर जेवन यामध्ये किमान तासभराचा वेळ जातो. काही ठिकाणी जरा जास्तच वेळ जातो.

सरकारी कार्यालयात वेळापत्रकाचा अभावसरकारी कार्यालयांमध्ये बहुतेक ठिकाणी कार्यालयीन कामकाजाची वेळ लिहिलेली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना दुपारी थोडा जरी उशीर झाला, तर लंच टाइमचा फटका बसतोच. त्यांना तासभर प्रतीक्षेत राहावे लागते.

जेवणाची वेळ दीड ते दोनचीशासकीय कार्यालयांमध्ये दुपारी एक ते दोन दरम्यान अर्धा तासाची वेळ ही जेवणाची निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात अनेक कार्यालयात दुपारी अडीचनंतरच जेवन अवकाश झाल्यानंतर कामकाज सुरू होत असल्याचे दिसून येते.

सर्वसामान्यांची अडचणअनेकदा ग्रामीण भागातून कामानिमित्त जिल्हा कार्यालयात येणारे नागरिक दुपारी १ च्या आत पोहचू शकत नाही. त्यामुळे त्यांना प्रतीक्षेत थांबावे लागते.

प्रत्यक्षात कर्मचारी दोन तास गायबकाही कर्मचारी जेवणाचा डब्बा आणतात, तर काही कर्मचारी दुपारी जेवण्यासाठी घरी जातात. दुपारी बाहेर जाण्यासाठी बायोमेट्रीकची अडचण नसल्याने जरा फुरसतनेच कार्यालयात येतात. काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन प्रचंड काम असते. सायंकाळी कार्यालय बंद झाल्यानंतर तासभर तरी काम सुरूच असल्याचे दिसून येते. अनेकदा सुटीच्या दिवशीही ते ऑफीसला येतात, त्यामुळे कामातून वेळ मिळाल्यानंतर ते जेवण करताना दिसतात. ज्या कार्यालयात बायोमेट्रीक मशीन नाही, तिथे कार्यालयात येण्यापासून ते दुपारचे जेवण व सायंकाळी घरी जाण्याची वेळ कधीही पाळल्या जात नसल्याचे दिसून येते. याकडे तेथीळ विभागप्रमुखांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

"सहकार विभागात कामानिमित्त आलो असता, दुपारी अडीचपर्यंत संबंधित कर्मचारी टेबलवर नव्हते. जेवण्यासाठी घरी गेल्याचे सांगण्यात आले."- प्रशांत वानखडे, अमरावती

"जिल्हा परिषदेत कामानिमित्त आलो असता दुपारी लंच टाइम होता. त्यानंतर तीनपर्यंत संबंधित कर्मचारी आलेच नाही. कृषी विभागातही असाच अनुभव आहे."- गणेश ठाकरे, मोर्शी

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकार