शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
5
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
6
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
7
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
8
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
9
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
10
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
11
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
12
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
13
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
14
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
15
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
16
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
17
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
18
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
19
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
20
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर

वऱ्हाडी बोलीत बालसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे: सतीश तराळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 21:52 IST

छत्रपती संभाजी महाराज पराक्रमीच नव्हे, तर बहुभाषिक प्रज्ञावंत साहित्यिक होते. पराक्रम आणि पांडित्य, प्रतिभा यांचा अनोखा मेळ छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष सतीश तराळ यांनी रविवारी केले.

अमरावती : छत्रपती संभाजी महाराज पराक्रमीच नव्हे, तर बहुभाषिक प्रज्ञावंत साहित्यिक होते. पराक्रम आणि पांडित्य, प्रतिभा यांचा अनोखा मेळ छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष सतीश तराळ यांनी रविवारी केले. येथील विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पहिल्या वऱ्हाडी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

मराठीची आद्यकविता ‘महदंबेचे ढवळे’ व आद्य गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ विदर्भात लिहिले गेले व त्यांच्या निर्मितीत वऱ्हाडी बोलीचा वाटा महत्त्वाचा आहे. वऱ्हाडी वाङ्मय म्हणजे केवळ वऱ्हाडी बोलीचे वाङ्मय नव्हे, तर येथील जाणिवेचे, जीवनाचे साहित्य होय.  वऱ्हाडी साहित्य समन्वयमहर्षी गुलाबराव महाराज यांनी प्रचंड ग्रथनिर्मितीच केली नाही, तर साहित्यशास्त्रीय विचार मांडून साहित्यशास्त्र निर्मितीतही योगदान दिले. वऱ्हाडी बोलीत बालसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे. बालसाहित्यच राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी कार्य करीत असते. याशिवाय वऱ्हाडी वाङ्मय, कथा, कविता, कादंबरीच्या पुढे जाऊन त्यात चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, नाटके, ललितनिबंध यांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. 

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जनसाहित्याचे प्रवर्तक सुभाष सावरकर, ज्येष्ठ कथाकार सुरेश आकोटकर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष दिलीप निंभोरकर आदींनी यावेळी विचार मांडले. त्यापूर्वी बाबाराव मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथनात, नरेंद्र माहुरतळे, विनय मिरासे, विनोद तिरमारे, अनघा सोनखासकर, संघमित्रा खंडारे, अ.भा. ठाकूर यांनी कथाकथन केले. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात अजय खडसे, राजेश महल्ले, कविता डवरे, ममता मस्के आदींनी कविता सादर केल्यात. यावेळी मिर्झा रफी अहमद बेग यांनीही रसिकांना मंत्रमुग्ध केले. विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली नवोदितांचे कविसंमेलन झाले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन वऱ्हाडी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष का.रा. चव्हाण यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. सभागृहात शेकडो रसिकांनी हजेरी लावली होती.

टॅग्स :Amravatiअमरावती