शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली 'बेघरमुक्त महाराष्ट्राची' ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:52 IST

मुख्यमंत्री फडणवीस : अमरावती जिल्ह्यात मोर्शी येथे शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंतप्रधान आवास योजनेत राज्यात नवा उच्चांक झाला आहे. सन २०१६ ते २०२२ या कार्यकाळात राज्यात १३ लाख घरे बांधण्यात आली. अद्याप ३० लाख घरे वेटिंगवर आहेत. याला केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. यांपैकी २० लाख घरांचे काम सुरू होत आहे. सध्या सात ते आठ लाख घरांचे काम सुरू झाले आहे. याद्वारे 'बेघरमुक्त महाराष्ट्र' तयार होत असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र शासनाने घरकुलासंदर्भात सर्व्हेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ज्यांच्याकडे घर बांधायला जागा नाही, त्यांना जागाही उपलब्ध करू आणि हक्काचे घरदेखील मिळणार आहे. या घरांसाठी राज्य शासन ५० हजार देणार आहे. याद्वारे प्रत्येक घरावर सोलर लावणार आहोत. त्यामुळे त्यांचे वीज बिल माफ होईल. प्रत्येक योजनेला स्थगिती देणारे सरकार गेल्याने अगोदर शिंदे मुख्यमंत्री असताना व आता राज्यातील सर्व योजना मार्गी लागल्या आहेत. मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्याने विविध व्यवस्थेचा फायदा दिला जात आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

कर्जमाफी करणारचकर्जमाफीचा विषय महत्त्वाचा आहे. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच, पाच वर्षात दोन वेळा कर्जमाफी झाल्यानंतर शेतकरी अडचणीत का?, यासाठी आम्ही समिती तयार केली असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी आता दरवर्षी पाच हजार कोटींची म्हणजे पाच वर्षांत २५ हजार कोटींची गुंतवणूक यामध्ये करणार आहोत. शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळावी, यासाठी 'मुख्यमंत्री सौरवाहिनी योजना' सुरू केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmravatiअमरावती