शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पावधितच गुंडाळली मुख्यमंत्री पेयजल योजना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

नवीन कामांचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचनाच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून न आल्यामुळे ही योजना पूर्णत: बंद झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत आहे. जुनीच कामे कशीतरी पूर्ण करून या योजनेची फाईल बंद करण्याच्या सूचना मंत्रालय पातळीवरून आल्या असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा : जिल्ह्यात नऊ गावांत मंजूर होती कामे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपूर्ण राज्य टँकरमुक्त करण्यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री पेजल योजना लवकरच गुंडाळली जाणार आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनर्जीवन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती गावकऱ्यांनसाठी शुद्ध पाण्याचे उद्दिष्ट ठेवून ही योजना सुरू केली होती. मात्र, बोटावर मोजण्याइतकेच काम पूर्ण करून ही योजना बंद करण्यात आली आहे.नवीन कामांचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचनाच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून न आल्यामुळे ही योजना पूर्णत: बंद झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत आहे. जुनीच कामे कशीतरी पूर्ण करून या योजनेची फाईल बंद करण्याच्या सूचना मंत्रालय पातळीवरून आल्या असल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेला ही योजना लागू करावी, यासंदर्भात शासनाने सन २०१७ मध्ये आदेश दिले होते. त्यानंतर गावांची निवड करून ग्रामपंचायत ठरावाची यादी पाणीपुरवठा मंत्रालयाला पाठवायची होती. मात्र, या निवडीत वर्ष लोटले. त्यामध्ये जिल्ह्यातील ९ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये नऊच कामांचा समावेश करण्यात आला होता. मुख्यमंत्री पेयजल योजनेतील मोठ्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्याचे ठरले. मंजूर असलेल्या कामाला सुरुवात झाली. या सर्व प्रकाराला सन २०१९ चा मुहूर्त निघाला. ठरवून दिलेल्या कालावधीत योजना पूर्ण करायच्या होत्या. यादीतील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वकनाथ, धारणीतील कुटंगा, चांदूर बाजारमधील विश्रोळी येथील योजनेचे ५० टक्केच कामे झाली आहेत. वरूडमधील बेनोडा, लोणी, नांदगावमधील बेलोरा हिरापूर येथील योजना ९५ टक्के पूर्ण झाल्या आहेत. धारणीमधील बेरदा बर्डा, अचलपूरमधील खेलतापमाळी, धामणगाव रेल्वेमधील कावली वसाड येथील योजना पूर्ण झाल्या आहेत. काही योजना पूर्ण झाल्या असल्या तरी वीजजोडणीअभावी सुरू झालेल्या नाहीत. त्या लवकरच सुरू होतील, असे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यातील काही कामे शिल्लक राहिली ती पूर्ण करून या योजनेला ब्रेक लाण्याची तयारी संबंधित विभागाने चालविली आहे. सुरुवातीला काही कामे पूर्ण झालीत. मात्र, यातही निधी मिळण्यास विलंब आणि तांत्रिक गुंतागुंतीमुळे कामे पूर्ण करण्यास होणारा विलंब यामुळे ही योजना बंद करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री पेयजल योजनेत कामे मंजूर केली जात नसली तरी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येकी ५० टक्के हिस्स्यातून मिळणाºया निधीतून मंजूर केली जात आहे.सध्या मुख्यमंत्री पेयजल योजनेत कामे मंज़ूर केली जात नसून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे मंजूर केली जात आहेत. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के हिस्सा याप्रमाणे निधी मिळत आहे.- राजेंद्र सावळकर,कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

टॅग्स :Waterपाणी