शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

ेगावागावांत रंगू लागल्या भावी मुख्यमंत्र्याच्या गप्पा

By admin | Updated: October 25, 2014 02:03 IST

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावा गावात राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण होणार ?

अमरावती : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावा गावात राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण होणार ? याबाबतच्या चर्चानी ग्रामीण भागात चांगलाच जोर पकडला आहे विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल एकदाचा लागून सहा दिवस लोटून गेले. मात्र, या निकालात भाजपला भरभरून मतदारांनी मतेही दिली. मात्र, कुठल्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. परिणामी सर्वाधिक संख्या असलेल्या भाजपला सत्तेसाठी लागणारा मॅजीक आकडा पूर्ण करण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. हे राजकीय समीकरण सर्वश्रूत आहे. मात्र नव्या सरकारमध्ये भावी मुख्यमंत्री कोण ? याची उत्सुकता सर्वसामान्यांनाही लागली आहे. नेमके याच विषयावर गावा गावात आता चर्चा रंगू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत मागील २५ वर्षापर्यंत युती असलेले भाजप, शिवसेना आणि १५ वर्षांपासून आघाडी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे राजकीय पक्ष पहिल्यांदाच एवढ्या वर्षांचा घरोबा तोडून वेगवेगळे ऐकमेकांविरोधात लढले. या लढतीत मतदारांनी आपल्या मताचा कौल सर्वाधिक भाजपाच्या पारड्यात टाकला. तर त्यापाठोपाठ शिवसेनला, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आणि कॉंग्रेस या पक्षांना आपल्या मताची मतदारांनी पसंती मतदान रूपाने दिली आहे. मतदारांनी मात्र हा कौल देताना स्पष्ट बहूमत कुठल्याही पक्षाच्या बाजूने दिले नाही. परिणामी सत्तास्थापनेसाठी भाजप हा पक्ष प्रमुख दावेदार आहे. विधानसभेचा निकाल जाहीर होऊन जवळपास सहा दिवसांचा कालावधी लोटून गेला आहे. अशातच ऐन सत्ता स्थापनेच्या कालावधीतच दिवाळी सण आल्याने यासाठी होणाऱ्या राजकीय उलथापालथही थंडावल्या आहेत.मात्र हे सर्व बरोबर असले तरी भाजपाच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये भावी मुख्यमंत्री कोण? गडकरी की फडणविस याबाबतच्या चर्चा गावा गावात सुरू झाल्या आहेत. भाजपा कुणाला मुख्यमंत्री म्हणून निवडणार याबाबतही वरील दोन विदर्भातील नेत्यांबाबत चर्चे दरम्यान व्यक्ती महत्वावरही आप-आपली मते मांडून आपल्यासोबत गप्पा करणाऱ्या इतर चार चौघांना पटवून देत असल्याचेही गावा गावातील चौकाचौकात , ओट्यावर चालणाऱ्या गप्पाच्या फडावर दिसून आल्या. अशावेळी रस्त्याने जाणारा एखादा गावातील पुढाऱ्यांनाही गाव गप्पा करणारे आवर्जुन विचारत ‘का रे, बा कोण होईल मुख्यमंत्री?’ याबाबत अशा व्यक्तीचीही मते मात्र जाणून घेतली जात आहे . एकंदरीत राज्याच्या भावी मुख्यमंत्र्याचे वेध राजकारण्याशिवाय सर्वसामान्यांना लागल्याचे यावरून दिसून येते.