शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

ेगावागावांत रंगू लागल्या भावी मुख्यमंत्र्याच्या गप्पा

By admin | Updated: October 25, 2014 02:03 IST

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावा गावात राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण होणार ?

अमरावती : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावा गावात राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण होणार ? याबाबतच्या चर्चानी ग्रामीण भागात चांगलाच जोर पकडला आहे विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल एकदाचा लागून सहा दिवस लोटून गेले. मात्र, या निकालात भाजपला भरभरून मतदारांनी मतेही दिली. मात्र, कुठल्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. परिणामी सर्वाधिक संख्या असलेल्या भाजपला सत्तेसाठी लागणारा मॅजीक आकडा पूर्ण करण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. हे राजकीय समीकरण सर्वश्रूत आहे. मात्र नव्या सरकारमध्ये भावी मुख्यमंत्री कोण ? याची उत्सुकता सर्वसामान्यांनाही लागली आहे. नेमके याच विषयावर गावा गावात आता चर्चा रंगू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत मागील २५ वर्षापर्यंत युती असलेले भाजप, शिवसेना आणि १५ वर्षांपासून आघाडी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे राजकीय पक्ष पहिल्यांदाच एवढ्या वर्षांचा घरोबा तोडून वेगवेगळे ऐकमेकांविरोधात लढले. या लढतीत मतदारांनी आपल्या मताचा कौल सर्वाधिक भाजपाच्या पारड्यात टाकला. तर त्यापाठोपाठ शिवसेनला, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आणि कॉंग्रेस या पक्षांना आपल्या मताची मतदारांनी पसंती मतदान रूपाने दिली आहे. मतदारांनी मात्र हा कौल देताना स्पष्ट बहूमत कुठल्याही पक्षाच्या बाजूने दिले नाही. परिणामी सत्तास्थापनेसाठी भाजप हा पक्ष प्रमुख दावेदार आहे. विधानसभेचा निकाल जाहीर होऊन जवळपास सहा दिवसांचा कालावधी लोटून गेला आहे. अशातच ऐन सत्ता स्थापनेच्या कालावधीतच दिवाळी सण आल्याने यासाठी होणाऱ्या राजकीय उलथापालथही थंडावल्या आहेत.मात्र हे सर्व बरोबर असले तरी भाजपाच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये भावी मुख्यमंत्री कोण? गडकरी की फडणविस याबाबतच्या चर्चा गावा गावात सुरू झाल्या आहेत. भाजपा कुणाला मुख्यमंत्री म्हणून निवडणार याबाबतही वरील दोन विदर्भातील नेत्यांबाबत चर्चे दरम्यान व्यक्ती महत्वावरही आप-आपली मते मांडून आपल्यासोबत गप्पा करणाऱ्या इतर चार चौघांना पटवून देत असल्याचेही गावा गावातील चौकाचौकात , ओट्यावर चालणाऱ्या गप्पाच्या फडावर दिसून आल्या. अशावेळी रस्त्याने जाणारा एखादा गावातील पुढाऱ्यांनाही गाव गप्पा करणारे आवर्जुन विचारत ‘का रे, बा कोण होईल मुख्यमंत्री?’ याबाबत अशा व्यक्तीचीही मते मात्र जाणून घेतली जात आहे . एकंदरीत राज्याच्या भावी मुख्यमंत्र्याचे वेध राजकारण्याशिवाय सर्वसामान्यांना लागल्याचे यावरून दिसून येते.