शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

बच्चू कडूंनी लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी परतवाडा-मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील सुपरवायझरच्या कानशिलात लगावली. सर्वसामान्यांसह आमदारांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने हा प्रकार घडला.नागरिकांची सुरक्षा व नियम धाब्यावर बसवून या बांधकामात पिवळी मातीचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गुरुवारी या ...

ठळक मुद्देहायवेच्या कामात दुर्लक्ष : नागरिकांचा त्रासाचा उद्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी परतवाडा-मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील सुपरवायझरच्या कानशिलात लगावली. सर्वसामान्यांसह आमदारांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने हा प्रकार घडला.नागरिकांची सुरक्षा व नियम धाब्यावर बसवून या बांधकामात पिवळी मातीचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गुरुवारी या मार्गावर एक अपघात झाला. तो पाहून आ. कडू यांनी सुपरवायझरच्या कानशिलात हाणल्या.महामार्गाच्या कामात पिवळी मातीचांदूरबाजार : राष्ट्रीय महामार्गाचे कामात पिवळ्या मातीवर पाणी टाकले जात नाही. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना दृष्टीरोग, अस्थमा, चर्मरोग आजाराचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याचा कंत्राट एच.जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. या मार्गावर काही ठिकाणी चिखल झाला आहे. गुरुवारी सकाळी आ. बच्चू कडू कुरळपूर्णा येथून चांदूर बाजार येथे परत येत असताना हैदतपूर वडाळा या गावाजवळ रस्त्यावरील चिखलामुळे एक विद्यार्थी घसरून पडला. रस्त्यावर पाणी टाकल्याने सर्वत्र पिवळी माती उडत होती. याची दखल घेत आ. कडू यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सुपरवायझरला विचारणा केली. मात्र सुपरवायझरतर्फे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतापलेल्या आ. बच्चू कडू यांनी त्याच्या कानशिलात हाणल्या. तसेच २४ तासात रस्त्याच्या बांधकामात पाण्याचा योग्य वापर न केल्यास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या कानशिलेत हाणणार असल्याचा इशारा दिला.