शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

वनकायद्यातील बदलांनी आदिवासींना उघड्यावर आणण्याचा डाव - वृंदा करात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 18:36 IST

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर टीका 

श्यामकांत पाण्डेय

धारणी (अमरावती) : केंद्रातील मोदी सरकार विविध प्रकल्पांच्या नावाखाली गोरगरीब आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित करण्यासाठी वन कायदा १९८१ मधील ग्रामसभेची तरतूद संपवून वनाधिकार कायदा २००६ सुधारित करून आदिवासींना हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवत आहे. गोरगरिबांना आपल्या उपजीविकेसाठी एकमेव आधार असलेली शेतजमीन वन व जल सिंचनाच्या नावाखाली प्रकल्प राबवून बळकविण्याचा व त्यांना वाऱ्यावर आणण्याचा डाव कोणत्याही प्रकारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सहन करणार नाही, असे सीपीआयच्या पॉलिट ब्यूरो सदस्य कॉम्रेड वृंदा करात (Brinda Karat) म्हणाल्या. धारणी येथे जाहीर सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

मोदी सरकार पैशांचा बळावर निवडून आलेले सरकार पाडण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रावर त्याचा परिणाम झाला आहे. सरकारने सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा चंग बाधला आहे. पूर्वीच्या वन कायद्यामध्ये कोणताही प्रकल्प राबवण्यापूर्वी ग्रामसभेची मान्यता आवश्यक होती. परंतु, या सरकारने वनाधिकार कायदा २००६ सुधारित करून त्यामधून ग्रामसभा शब्द हटवून बळजबरीने आदिवासींच्या जमिनी खाली करून घेऊन त्यांना नाममात्र मोबदला देऊन वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार केला आहे, असे वृंदा करात म्हणाल्या. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचा जर येथील जनता विरोध करीत असेल, तर आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाईफ फंक्शन हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेला काॅ. उदयन शर्मा, रणजित घोडेस्वार, भारत वरठे यांच्यासह मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती.मेळघाटात वाचा हनुमान चालिसा

अमरावती जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा यांचे नाव न घेता त्यांनी मोठ्या शहरांमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचण्याऐवजी मेळघाटात येऊन आदिवासी चालिसा वाचावी, असा टोला वृंदा करात यांनी लगावला. एकंदर मेळघाटातील समस्यांबाबत आमचा पक्ष गंभीर असून आदिवासींना वनजमिनीचे हक्क प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे त्या म्हणाल्या.  

पक्षाची बांधणी करणार 

कॉम्रेड सुदामकाका देशमुख मेळघाटातील जबरदस्त पाठिंब्याच्या बळावर जिल्ह्यातील एकमेव कम्युनिस्ट खासदार झाले होते. त्यानंतर पक्ष मेळघाटातून हद्दपार झाला आहे. आता आम्ही नव्याने पक्ष बांधणी करीत असून त्यासाठी कार्यकर्ता मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला होता, असे वृंदा करात म्हणाल्या.

टॅग्स :PoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmravatiअमरावतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना