शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

२४ मार्चपर्यंत हलका, मध्यम पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:13 IST

----------------------- ५४८ व्यक्तींना रविवारी डिस्चार्ज अमरावती : उपचारादरम्यान बरे वाटल्याने रविवारी ५४८ जणांना घरी सोडण्यात आले. त्यांना आता एक ...

-----------------------

५४८ व्यक्तींना रविवारी डिस्चार्ज

अमरावती : उपचारादरम्यान बरे वाटल्याने रविवारी ५४८ जणांना घरी सोडण्यात आले. त्यांना आता एक आठवडा गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ४०,४०० वर पोहोचली आहे. ही टक्केवारी ८९ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

-----------------------

रुग्ण दुपटीचा कालावधी ३२ दिवसांवर

अमरावती : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२ दिवसांवर आल्याची धक्कादायक माहिती आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये हाच ‘डबलिंग रेट’ फक्त १५ दिवसांवर आला होता. आता कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने कालावधी ३२ दिवसांवर पोहोचल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.

------------------------

रविवारी ५,२५७ चाचण्यांचा उच्चांक

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजारांच्या आसपास चाचण्या करण्यात येत होत्या. आता विद्यापीठ लॅबची क्षमता वाढविण्यात आल्यामुळे तीन हजारांपर्यंत चाचण्या होत आहे. याशिवाय ग्रामीण भागात रॅपिड अँटिजेनच्या चाचण्या वाढल्याने सद्यस्थितीत होत असलेल्या चाचण्या उच्चांकी असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

------------------------

रविवारी ५,२२७ संशयित रुग्णांची तपासणी

अमरावती : जिल्ह्यात रविवारी ५,२२७ संशयित रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यत २,९२,५८७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. २,८५,४३३ नमुने तपासणी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. यापैकी ४५,३९५ नमुने पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

-------------------------

पावसाने गहू, हरभरा पिकाचे नुकसान

अमरावती : जिल्ह्यात काही भागात सुरू असलेला पाऊस व गारपीटमुळे सवंगणी केलेला हरभरा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय संत्राचीही फळगळ झालेली आहे. या नुकसानीचे पंचनामे करून मदत निधी देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

-----------------------

प्रभागात धुरळणी, फवारणी केव्हा?

अमरावती : महापालिका क्षेत्रातील अनेक प्रभागात कित्येक महिन्यांपासून धुरळणी व फवारणी झालेली नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्यामुळे स्वच्छता कंत्राटदार धुरळणी व फवारणी करण्याचे टाळत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

------------------------

दंडात्मक कारवाया पुन्हा माघारल्या

अमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारा पथके नेमून महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. आता संसर्ग कमी झाल्यानंतर या कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळे अनेक भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना फाटा दिल्या जात आहे.

---------------------

राजकमल चौक फलकमुक्त केव्हा?

अमरावती : शहर सौदर्यीकरणाचे दृष्टीने राजकमल चौक फलकमुक्त करण्यात आल्याचे महापौर चेतन गावंडे यांनी चार महिन्यापूर्वीजाहीर केले होते. मात्र, महापालिका प्रशासनाला या निर्देशाचा विसर पडल्याने व कोणतीही कारवाई केलीजात नसल्यानेच पुन्हा हा चौक विनापरवानगी जाहिरातींनी बुजला आहे.