शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

लसीकरणाची नव्हे, संक्रमणाची केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या अर्थाने १८ वयोगटावरील प्रत्येकासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातही शहरी केंद्रांवर गर्दी होत असल्याने आता ग्रामीणमध्ये धाव घेतल्याने तेथीलही केंद्रांवर रांगा आहेत. या रांगेत एखादा असिम्टमॅटिक  रुग्ण आल्यास त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे.

ठळक मुद्देपहाटे ४ पासून रांग, फिजिकल डिस्टन्सचा अभाव, गर्दीमुळे वाढला कोरोनाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात लसीकरणाच्या १३५ केंद्रांवर अलीकडे पहाटे ४ पासून रांगा लागत आहेत. बहुतेक केंद्रांवर शेकडो नागरिकांच्या रांगेत फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रे कोरोना प्रतिबंधासाठी की संसर्गवाढीसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या अर्थाने १८ वयोगटावरील प्रत्येकासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातही शहरी केंद्रांवर गर्दी होत असल्याने आता ग्रामीणमध्ये धाव घेतल्याने तेथीलही केंद्रांवर रांगा आहेत. या रांगेत एखादा असिम्टमॅटिक  रुग्ण आल्यास त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे.महापालिका क्षेत्रात १८ व ग्रामीणमध्ये ११७ केंद्रांवर सद्यस्थितीत पाच टप्प्यांमधील लसीकरण होत आहे. आतापर्यंत ३,५२,४०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सुरुवातीच्या काळात १६ जानेवारीला हेल्थ लाईन वर्कर व त्यानंतर फ्रंट लाइन वर्कर या दोन टप्प्यात लसीकरण करण्यात आले. साधारणपणे ६२,३१५ लाभार्थींनी या गटात लस घेतली आहे. यावेळेस जिल्ह्यात केवळ २० ते २२ केंद्र असताना केंद्रांवर रांगा नव्हत्या. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केंद्रे वाढली व केंद्रांवर गर्दीदेखील वाढायला लागली. काही दिवसांनंतर ४५ वर्षांवरील कोमार्बिडीटी आजारांच्या रुग्णांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर पुन्हा काही केंद्रे नव्याने  सुरु करण्यात आली. आता १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. या गटासाठी स्वतंत्र केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. ऑनलाईन नोंदणी व अपाॅईंटमेंट असल्यामुळे या केंद्रांवर फारशी गर्दी नाही. मात्र, लिंक सुरु होत नाही. केंद्रांवर क्लिक करण्यापूर्वीच बुक झालेली दाखवितात. ऑनलाईन नोंदणी केव्हा सुरू होणार, याची पूर्वसूचना दिली जात नाही व दोन मिनिटांत केंद्र हाऊसफुल्ल दाखवित असल्याचा आरोप होत आहे.

रँडम सर्वेक्षणात दोन टक्के पॉझिटिव्हजिल्ह्यात निवडणूक निमित्ताने १० हजारांवर कर्मचाऱ्यांची करण्यात आलेली कोरोना चाचणी, याशिवाय रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचण्या यामध्ये दोन ते तीन टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या शेकडो नागारिकांच्या रांगेतही काही पॉझिटिव्ह आहेत. हे गृहीत धरून फिजिकल डिस्टन्स ठेवणे महत्त्वाचे असताना, तसे होताना दिसत नाही.

अपंगांसह ज्येष्ठ नागरिकांची परवडलसीकरण केंद्रांवर अंपगांसह ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे. बहुतांश केंद्रांवर प्रसाधनगृह, पाणी व सावलीसाठी सुविधा नाही. मिळेल तेवढ्याच सावलीच्या आडोशाने नागरिक दाटीवाटीने उभे राहतात. जास्तच गर्दी वाढल्यास केंद्रांवर पोलिसांना पाचारण केले जाते. केंद्रावर महिलांचीदेखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोप होत आहे. अपंगांकरिता विशेष सुविधा कुठेही उपलब्ध नाहीत. 

गर्दी ओसरल्यावर पुन्हा टोकन वाटपकेंद्रांवर गर्दी कमी होण्यासाठी उपलब्ध लसींच्या प्रमाणात नागरिकांना टोकनचे वाटप करण्यात येते. त्यामुळे डोज संपल्याचे गृहीत धरून नागरिक केंद्रांवरून घरी जातात. त्यानंतर काही वेळाने पुन्हा टोकन देण्याचा प्रकार काही केंद्रांवर घडला. डोससाठी नंबर लागेल, या आशेने रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांवर हा अन्याय आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा देण्यात येणारे टोकन कोणासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस