शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

लसीकरणाची नव्हे, संक्रमणाची केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या अर्थाने १८ वयोगटावरील प्रत्येकासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातही शहरी केंद्रांवर गर्दी होत असल्याने आता ग्रामीणमध्ये धाव घेतल्याने तेथीलही केंद्रांवर रांगा आहेत. या रांगेत एखादा असिम्टमॅटिक  रुग्ण आल्यास त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे.

ठळक मुद्देपहाटे ४ पासून रांग, फिजिकल डिस्टन्सचा अभाव, गर्दीमुळे वाढला कोरोनाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात लसीकरणाच्या १३५ केंद्रांवर अलीकडे पहाटे ४ पासून रांगा लागत आहेत. बहुतेक केंद्रांवर शेकडो नागरिकांच्या रांगेत फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रे कोरोना प्रतिबंधासाठी की संसर्गवाढीसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या अर्थाने १८ वयोगटावरील प्रत्येकासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातही शहरी केंद्रांवर गर्दी होत असल्याने आता ग्रामीणमध्ये धाव घेतल्याने तेथीलही केंद्रांवर रांगा आहेत. या रांगेत एखादा असिम्टमॅटिक  रुग्ण आल्यास त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे.महापालिका क्षेत्रात १८ व ग्रामीणमध्ये ११७ केंद्रांवर सद्यस्थितीत पाच टप्प्यांमधील लसीकरण होत आहे. आतापर्यंत ३,५२,४०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सुरुवातीच्या काळात १६ जानेवारीला हेल्थ लाईन वर्कर व त्यानंतर फ्रंट लाइन वर्कर या दोन टप्प्यात लसीकरण करण्यात आले. साधारणपणे ६२,३१५ लाभार्थींनी या गटात लस घेतली आहे. यावेळेस जिल्ह्यात केवळ २० ते २२ केंद्र असताना केंद्रांवर रांगा नव्हत्या. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केंद्रे वाढली व केंद्रांवर गर्दीदेखील वाढायला लागली. काही दिवसांनंतर ४५ वर्षांवरील कोमार्बिडीटी आजारांच्या रुग्णांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर पुन्हा काही केंद्रे नव्याने  सुरु करण्यात आली. आता १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. या गटासाठी स्वतंत्र केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. ऑनलाईन नोंदणी व अपाॅईंटमेंट असल्यामुळे या केंद्रांवर फारशी गर्दी नाही. मात्र, लिंक सुरु होत नाही. केंद्रांवर क्लिक करण्यापूर्वीच बुक झालेली दाखवितात. ऑनलाईन नोंदणी केव्हा सुरू होणार, याची पूर्वसूचना दिली जात नाही व दोन मिनिटांत केंद्र हाऊसफुल्ल दाखवित असल्याचा आरोप होत आहे.

रँडम सर्वेक्षणात दोन टक्के पॉझिटिव्हजिल्ह्यात निवडणूक निमित्ताने १० हजारांवर कर्मचाऱ्यांची करण्यात आलेली कोरोना चाचणी, याशिवाय रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचण्या यामध्ये दोन ते तीन टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या शेकडो नागारिकांच्या रांगेतही काही पॉझिटिव्ह आहेत. हे गृहीत धरून फिजिकल डिस्टन्स ठेवणे महत्त्वाचे असताना, तसे होताना दिसत नाही.

अपंगांसह ज्येष्ठ नागरिकांची परवडलसीकरण केंद्रांवर अंपगांसह ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे. बहुतांश केंद्रांवर प्रसाधनगृह, पाणी व सावलीसाठी सुविधा नाही. मिळेल तेवढ्याच सावलीच्या आडोशाने नागरिक दाटीवाटीने उभे राहतात. जास्तच गर्दी वाढल्यास केंद्रांवर पोलिसांना पाचारण केले जाते. केंद्रावर महिलांचीदेखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोप होत आहे. अपंगांकरिता विशेष सुविधा कुठेही उपलब्ध नाहीत. 

गर्दी ओसरल्यावर पुन्हा टोकन वाटपकेंद्रांवर गर्दी कमी होण्यासाठी उपलब्ध लसींच्या प्रमाणात नागरिकांना टोकनचे वाटप करण्यात येते. त्यामुळे डोज संपल्याचे गृहीत धरून नागरिक केंद्रांवरून घरी जातात. त्यानंतर काही वेळाने पुन्हा टोकन देण्याचा प्रकार काही केंद्रांवर घडला. डोससाठी नंबर लागेल, या आशेने रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांवर हा अन्याय आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा देण्यात येणारे टोकन कोणासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस