शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

बस प्रवाश्यांना करावा लागतो टपावरून जीवघेणा प्रवास; पालकमंत्र्यांना ३० बसगाड्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:00 IST

३० बसगाड्या द्या, पालकमंत्र्यांना पत्र : अनेक पाड्यांमध्ये बस नाहीच

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत अतिदुर्गम आदिवासी पाडे तर सोडाच, अगदी रस्त्यावरील गावांमध्येसुद्धा बस जात नसल्याचे वास्तव आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही आदिवासींना खासगी वाहनांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यादरम्यान धारणी व चिखलदरा तालुक्यासाठी मानव विकास संसाधन मंत्रालयामार्फत ३० बसगाड्या देण्याची मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक निवेदनाद्वारे केली.

भंगार बसचे आगार म्हणून कुख्यात परतवाडा आगारात पाच बस नव्याने दाखल झाल्या. परंतु, मेळघाटच्या नशिबी नादुरुस्त व भंगार गाड्याच आहेत. अपघात घडले तरी आदिवासींच्या नशिबी आजही त्या भंगार बस किंवा अवैध प्रवासी वाहनाच्या टपावर, कोंबून प्रवास करावा लागत आहे. मेळघाटच्या नावावर अनेक सुविधा शासन देत असले तरी त्यात मूलभूत सुविधा बेपत्ता असल्याचे चित्र अत्यंत क्लेशदायक आहे.

३०० खेडी आणि बारा बस. धारणी व चिखलदरा तालुक्यात दुर्गम-अतिदुर्गम मिळून जवळपास ३०० आदिवासी पाडे आहेत. मेळघाटात केवळ १२ ते १५ बस आहेत.

धारणी आगार केव्हा?चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व मेळघाटातील धारणी येथे बस आगार याच सरकारने गतवर्षी मंजूर केले. प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही.

३० बसची मागणीधारणी व चिखलदरा तालुक्यांत आदिवासींना प्रवास सुविधेसाठी पहिल्या टप्प्यात किमान ३० बसगाड्या देण्याची मागणी आ. केवलराम काळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून केली आहे.

फाट्यावर सोडून जाते बसआजही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये बस प्रत्यक्ष जात नाही. दीडशेपेक्षा अधिक गावांच्या फाट्यावर बस प्रवाशाला सोडून जाते. तेथून दिवसा व रात्रीही पायी गाव गाठावे लागते.

"आदिवासी पाड्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामान्य नागरिकांना आणि प्रवासासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. नवीन बसगाड्यांतून काही प्रमाणात अडचणी दूर होतील."- केवलराम काळे, आमदार, मेळघाट

टॅग्स :AmravatiअमरावतीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे