शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

स्वातंत्र्यानंतर अमरावती जिल्ह्यातील बुलुमगव्हाणमध्ये प्रथमच आली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:15 IST

दिवसभर राब-राब रानात राबल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर टिमटिमत्या चिमणीच्या ज्योतीवर रात्र घालवणाऱ्या अतिदुर्गम भागातील बुलुमगव्हाण आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी १५ मार्चची रात्र अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली.

ठळक मुद्देप्रत्येक घरी मोफत जोडणीमहावितरणने ‘सौभाग्य’ योजनेतून पेरला प्रकाश

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवसभर राब-राब रानात राबल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर टिमटिमत्या चिमणीच्या ज्योतीवर रात्र घालवणाऱ्या अतिदुर्गम भागातील बुलुमगव्हाण आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी १५ मार्चची रात्र अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली. महावितरणने पंतप्रधान सहज बिजली म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून विकासाचा हात देत येथील आदिवासींच्या जीवनात प्रकाश पेरला. कित्येक पिढ्यांनंतर या गावात वीज आल्याने तेथील आदिवासींचे चेहरे आनंदाने फुलले होते.सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील बुलूमगव्हाण या शंभरेक घरे असलेल्या पाड्यात सायंकाळनंतर अंधाराचेच साम्राज्य राहायचे. वीज काय असते तेच माहित नव्हते. त्यामुळे विजेचे महत्त्व कळणे तर दूरच झाले. वीज नसल्याने नळ नाही. कोणतेही करमणुकीचे साधन नाही. मोबाईल नाही. गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात वीज जरी कळली असेल तरी पण त्यांच्यासाठी आणि पाड्यातील आदिवासींसाठी ते दिवास्वप्नच होते.महावितरणचे अमरावती परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता सुहास मेत्रे, धारणीचे सहायक जिल्हाधिकारी विजय राठोड, कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक आनंद जोशी यांच्या प्रयत्नाने तसेच अचलपूर कार्यकारी अभियंता दीपक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली नाझिया खान, धारणी उपविभागाचे अभियंता विनय तायडे, ए.एस. पंचभाई, आर.बी.जरोदे व यांच्या पाठपुराव्यामुळे पाड्यापर्यंत वीज पोहचली व 'सौभाग्य' योजनेतून येथील सर्वच घरात वीज देण्यात आली.स्वतंत्र रोहीत्र, आदिवासी उपयोजनेतून खर्चमहाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट असलेले बुलुमगव्हाण हे गाव धारणीपासून ३० ते ३५ किमी. अंतरावर आहे. अतिदुर्गम भागातील या गावात भौगोलिक परिस्थितीमुळे व घनदाट वनांमुळे वीज पोहचविणे महावितरणसाठीही जिकिरीचे होते. यासाठी प्रथम काटकुमर ते बुलुमगव्हाण अशी ५ किमी. उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्यात आली. पाड्याला वीजपुरवठा करण्यासाठी एक रोहीत्र उभारण्यात आले. यासाठी लागणारा खर्च आदिवासीक्षेत्र उपयोजनेंतर्गत करण्यात आला.गावात ३० खांबांवर पथदिवेशंभर घरांची वस्ती असणाऱ्या या गावात सर्व घरी वीज पोहचावी, गावातील मार्गावर पथदिव्यांची सोय करता यावी, यासाठी ३० विजेचे खांब लावण्यात आले. प्रत्येक खांबावर महावितरणच्यावतीने पथदिवेही लावण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण