शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

स्वातंत्र्यानंतर अमरावती जिल्ह्यातील बुलुमगव्हाणमध्ये प्रथमच आली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:15 IST

दिवसभर राब-राब रानात राबल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर टिमटिमत्या चिमणीच्या ज्योतीवर रात्र घालवणाऱ्या अतिदुर्गम भागातील बुलुमगव्हाण आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी १५ मार्चची रात्र अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली.

ठळक मुद्देप्रत्येक घरी मोफत जोडणीमहावितरणने ‘सौभाग्य’ योजनेतून पेरला प्रकाश

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवसभर राब-राब रानात राबल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर टिमटिमत्या चिमणीच्या ज्योतीवर रात्र घालवणाऱ्या अतिदुर्गम भागातील बुलुमगव्हाण आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी १५ मार्चची रात्र अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली. महावितरणने पंतप्रधान सहज बिजली म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून विकासाचा हात देत येथील आदिवासींच्या जीवनात प्रकाश पेरला. कित्येक पिढ्यांनंतर या गावात वीज आल्याने तेथील आदिवासींचे चेहरे आनंदाने फुलले होते.सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील बुलूमगव्हाण या शंभरेक घरे असलेल्या पाड्यात सायंकाळनंतर अंधाराचेच साम्राज्य राहायचे. वीज काय असते तेच माहित नव्हते. त्यामुळे विजेचे महत्त्व कळणे तर दूरच झाले. वीज नसल्याने नळ नाही. कोणतेही करमणुकीचे साधन नाही. मोबाईल नाही. गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात वीज जरी कळली असेल तरी पण त्यांच्यासाठी आणि पाड्यातील आदिवासींसाठी ते दिवास्वप्नच होते.महावितरणचे अमरावती परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता सुहास मेत्रे, धारणीचे सहायक जिल्हाधिकारी विजय राठोड, कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक आनंद जोशी यांच्या प्रयत्नाने तसेच अचलपूर कार्यकारी अभियंता दीपक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली नाझिया खान, धारणी उपविभागाचे अभियंता विनय तायडे, ए.एस. पंचभाई, आर.बी.जरोदे व यांच्या पाठपुराव्यामुळे पाड्यापर्यंत वीज पोहचली व 'सौभाग्य' योजनेतून येथील सर्वच घरात वीज देण्यात आली.स्वतंत्र रोहीत्र, आदिवासी उपयोजनेतून खर्चमहाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट असलेले बुलुमगव्हाण हे गाव धारणीपासून ३० ते ३५ किमी. अंतरावर आहे. अतिदुर्गम भागातील या गावात भौगोलिक परिस्थितीमुळे व घनदाट वनांमुळे वीज पोहचविणे महावितरणसाठीही जिकिरीचे होते. यासाठी प्रथम काटकुमर ते बुलुमगव्हाण अशी ५ किमी. उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्यात आली. पाड्याला वीजपुरवठा करण्यासाठी एक रोहीत्र उभारण्यात आले. यासाठी लागणारा खर्च आदिवासीक्षेत्र उपयोजनेंतर्गत करण्यात आला.गावात ३० खांबांवर पथदिवेशंभर घरांची वस्ती असणाऱ्या या गावात सर्व घरी वीज पोहचावी, गावातील मार्गावर पथदिव्यांची सोय करता यावी, यासाठी ३० विजेचे खांब लावण्यात आले. प्रत्येक खांबावर महावितरणच्यावतीने पथदिवेही लावण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण