शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
3
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
4
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
5
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
6
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
7
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
8
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
9
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
10
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
11
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
12
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
13
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
14
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
15
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
16
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
17
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
19
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
20
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

स्वातंत्र्यानंतर अमरावती जिल्ह्यातील बुलुमगव्हाणमध्ये प्रथमच आली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:15 IST

दिवसभर राब-राब रानात राबल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर टिमटिमत्या चिमणीच्या ज्योतीवर रात्र घालवणाऱ्या अतिदुर्गम भागातील बुलुमगव्हाण आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी १५ मार्चची रात्र अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली.

ठळक मुद्देप्रत्येक घरी मोफत जोडणीमहावितरणने ‘सौभाग्य’ योजनेतून पेरला प्रकाश

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवसभर राब-राब रानात राबल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर टिमटिमत्या चिमणीच्या ज्योतीवर रात्र घालवणाऱ्या अतिदुर्गम भागातील बुलुमगव्हाण आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी १५ मार्चची रात्र अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली. महावितरणने पंतप्रधान सहज बिजली म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून विकासाचा हात देत येथील आदिवासींच्या जीवनात प्रकाश पेरला. कित्येक पिढ्यांनंतर या गावात वीज आल्याने तेथील आदिवासींचे चेहरे आनंदाने फुलले होते.सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील बुलूमगव्हाण या शंभरेक घरे असलेल्या पाड्यात सायंकाळनंतर अंधाराचेच साम्राज्य राहायचे. वीज काय असते तेच माहित नव्हते. त्यामुळे विजेचे महत्त्व कळणे तर दूरच झाले. वीज नसल्याने नळ नाही. कोणतेही करमणुकीचे साधन नाही. मोबाईल नाही. गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात वीज जरी कळली असेल तरी पण त्यांच्यासाठी आणि पाड्यातील आदिवासींसाठी ते दिवास्वप्नच होते.महावितरणचे अमरावती परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता सुहास मेत्रे, धारणीचे सहायक जिल्हाधिकारी विजय राठोड, कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक आनंद जोशी यांच्या प्रयत्नाने तसेच अचलपूर कार्यकारी अभियंता दीपक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली नाझिया खान, धारणी उपविभागाचे अभियंता विनय तायडे, ए.एस. पंचभाई, आर.बी.जरोदे व यांच्या पाठपुराव्यामुळे पाड्यापर्यंत वीज पोहचली व 'सौभाग्य' योजनेतून येथील सर्वच घरात वीज देण्यात आली.स्वतंत्र रोहीत्र, आदिवासी उपयोजनेतून खर्चमहाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट असलेले बुलुमगव्हाण हे गाव धारणीपासून ३० ते ३५ किमी. अंतरावर आहे. अतिदुर्गम भागातील या गावात भौगोलिक परिस्थितीमुळे व घनदाट वनांमुळे वीज पोहचविणे महावितरणसाठीही जिकिरीचे होते. यासाठी प्रथम काटकुमर ते बुलुमगव्हाण अशी ५ किमी. उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्यात आली. पाड्याला वीजपुरवठा करण्यासाठी एक रोहीत्र उभारण्यात आले. यासाठी लागणारा खर्च आदिवासीक्षेत्र उपयोजनेंतर्गत करण्यात आला.गावात ३० खांबांवर पथदिवेशंभर घरांची वस्ती असणाऱ्या या गावात सर्व घरी वीज पोहचावी, गावातील मार्गावर पथदिव्यांची सोय करता यावी, यासाठी ३० विजेचे खांब लावण्यात आले. प्रत्येक खांबावर महावितरणच्यावतीने पथदिवेही लावण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण