शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सलग सुट्यांमुळे बोंडअळीचे पंचनामे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:34 PM

गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे पीक उद्वस्त झाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी,....

ठळक मुद्दे१४ डिसेंबर होती ‘डेडलाईन’ : अद्याप ७० टक्क्यांवरच रखडले काम

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे पीक उद्वस्त झाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी, यासाठी शासनाने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश सात डिसेंबरला देऊन एका आठवड्यात अहवाल मागितला. मात्र, या मुदतीला दोन आठवड्यांचा कालावधी होऊनही पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सलग तीन सुट्यांमुळे पंचनाम्याचे काम बाधित झाल्याचा आरोप होत आहे.यंदाच्या खरिपात जिल्ह्यात दोन लाख ८ हजार क्षेत्रात कपाशीचे क्षेत्र आहे. पेरणी काळात अल्प पावसामुळे शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. यातून जी कपाशी बचावली तिच्यावर आॅक्टोबर महिण्यात पात्या फुलांवर असताना गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला. यामध्ये जिल्ह्यातील ८० टक्के कपाशी पीक बाधित झाले. हजारो हेक्टरमधील कपाशीच्या उभ्या पिकावर शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरविला. शेतकऱ्यांना केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी, यासाठी राज्य शासनाने ७ डिसेंबरला पंचनाम्याचे आदेश दिलेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील महसूल व कृषी विभागाला संयुक्त पंचनाम्याचे आदेश देऊन दोन दिवसांत अहवाल मागितला. आता दोन आठवडे झाले असतानाही पंचनामा व अहवाल तयार झालेला नाही. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्यामुळेच यंत्रणा सुस्तावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.दीड लाख हेक्टरवर क्षेत्रात प्रादुर्भावकृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात एक लाख हेक्टर बोंडअळीने बाधित झाल्याचा अहवाल शासनाला दिला. प्रत्यक्षात दीड लाख हेक्टरवरील कपाशी बाधित असल्याचे वास्तव आहे. सद्यस्थितीत पंचनाम्यांचे काम ७० टक्क्यांवरच झाले असल्याची माहिती आहे.कपाशीवरील बोंडअळीच्या नुकसानीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत सर्व तालुक्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.-अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी