शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

ब्राह्मणवाडा थडी मंडळाला अतिवृष्टीच्या मदतीतून वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:13 IST

प्रशासनाच्या चुकीचा सात हजार शेतकऱ्यांना फटका : महसूल प्रशासनाने फक्त दोनच मंडळांसाठी केली निधीची मागणी, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना २३ सप्टेंबर २०२४ शासन निर्णयानुसार आर्थिक मदत मिळणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय नुकसानभरपाईच्या निधीची मागणी करणे गरजेचे होते. मात्र, तालुक्यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असताना दोनच महसूल मंडळांसाठी निधीची मागणी महसूल व कृषी विभागाने केली. ब्राह्मणवाडा थडी महसूल मंडळाला वगळल्याने त्याचा फटका अंदाजे ७ हजार ४०० शेतकऱ्यांना बसला आहे.

तालुक्यातील सात मंडळांपैकी जुलै व ऑगस्ट महिन्यांत करजगाव, तळेगाव मोहना व ब्राह्मणवाडा थडी या तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली होती. यापैकी करजगाव व तळेगाव मोहना या दोन मंडळांतील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी पीक नुकसानासाठी मदत निधीची मागणी महसूल व कृषी विभागाने केली आहे. करजगाव मंडळातील २७९८ शेतकऱ्यांच्या, २१४७ हेक्टरच्या पीक नुकसानासाठी २ कोटी ९१ लाख ८५ लाख ८७२ रुपये, तर तळेगाव मोहना मंडळातील ५२७६ शेतकऱ्यांच्या ४७१५.९२ हेक्टरसाठी ६ कोटी ४१ लाख ३६ हजार ५१२ रुपये निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 

प्रशासनाला ब्राम्हणवाडा शेतकऱ्यांचा विसरब्राह्मणवाडा थडी मंडळात तीन वेळच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीकनिहाय झालेले नुकसान याचे पाहणी सर्वेक्षण करण्याचेही सौजन्य महसूल व कृषी विभागाने दाखविले नाही. तालुक्यातील दोन मंडळांतील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचा निधी मागणारे प्रशासन ब्राह्मणवाडा थडी मंडळातील शेतकऱ्यांना मात्र सपशेल विसरले. ७४०० ब्राह्मणवाडा थडी महसूल मंडळाला अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळल्याने त्याचा फटका मंडळातील अंदाजे ७ हजार ४०० शेतकऱ्यांना बसला आहे.

"तांत्रिक अडचणींमुळे ही चूक झाली असावी. ब्राह्मणवाडा थडी मंडळातील अतिवृष्टीच्या पीक नुकसानीची माहिती घेण्यात येईल. विशेष बाबअंतर्गत निधीची मागणी करून मदत देण्यात येईल."- रामदास शेळके, तहसीलदार, चांदूर बा.

"ब्राह्मणवाडा थडी मंडळात नुकसानाचे सर्वेक्षणच झाले नाही. स्थानिक महसूल व कृषी प्रशासनाच्या अक्षम्य चुकीबद्दल लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाब विचारून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळवून द्यावी."- वामन ईसळ शेतकरी, गणोजा

"अतिवृष्टी मदतीची मागणी करून मदत देण्यात आली नाही. तीनही मंडळातील शेतकऱ्यांना, अतिवृष्टीची मदत देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल."- गोपाल भालेराव, अध्यक्ष, लोक विकास संघटना

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊस