शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

ब्राह्मणवाडा थडी मंडळाला अतिवृष्टीच्या मदतीतून वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:13 IST

प्रशासनाच्या चुकीचा सात हजार शेतकऱ्यांना फटका : महसूल प्रशासनाने फक्त दोनच मंडळांसाठी केली निधीची मागणी, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना २३ सप्टेंबर २०२४ शासन निर्णयानुसार आर्थिक मदत मिळणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय नुकसानभरपाईच्या निधीची मागणी करणे गरजेचे होते. मात्र, तालुक्यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असताना दोनच महसूल मंडळांसाठी निधीची मागणी महसूल व कृषी विभागाने केली. ब्राह्मणवाडा थडी महसूल मंडळाला वगळल्याने त्याचा फटका अंदाजे ७ हजार ४०० शेतकऱ्यांना बसला आहे.

तालुक्यातील सात मंडळांपैकी जुलै व ऑगस्ट महिन्यांत करजगाव, तळेगाव मोहना व ब्राह्मणवाडा थडी या तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली होती. यापैकी करजगाव व तळेगाव मोहना या दोन मंडळांतील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी पीक नुकसानासाठी मदत निधीची मागणी महसूल व कृषी विभागाने केली आहे. करजगाव मंडळातील २७९८ शेतकऱ्यांच्या, २१४७ हेक्टरच्या पीक नुकसानासाठी २ कोटी ९१ लाख ८५ लाख ८७२ रुपये, तर तळेगाव मोहना मंडळातील ५२७६ शेतकऱ्यांच्या ४७१५.९२ हेक्टरसाठी ६ कोटी ४१ लाख ३६ हजार ५१२ रुपये निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 

प्रशासनाला ब्राम्हणवाडा शेतकऱ्यांचा विसरब्राह्मणवाडा थडी मंडळात तीन वेळच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीकनिहाय झालेले नुकसान याचे पाहणी सर्वेक्षण करण्याचेही सौजन्य महसूल व कृषी विभागाने दाखविले नाही. तालुक्यातील दोन मंडळांतील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचा निधी मागणारे प्रशासन ब्राह्मणवाडा थडी मंडळातील शेतकऱ्यांना मात्र सपशेल विसरले. ७४०० ब्राह्मणवाडा थडी महसूल मंडळाला अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळल्याने त्याचा फटका मंडळातील अंदाजे ७ हजार ४०० शेतकऱ्यांना बसला आहे.

"तांत्रिक अडचणींमुळे ही चूक झाली असावी. ब्राह्मणवाडा थडी मंडळातील अतिवृष्टीच्या पीक नुकसानीची माहिती घेण्यात येईल. विशेष बाबअंतर्गत निधीची मागणी करून मदत देण्यात येईल."- रामदास शेळके, तहसीलदार, चांदूर बा.

"ब्राह्मणवाडा थडी मंडळात नुकसानाचे सर्वेक्षणच झाले नाही. स्थानिक महसूल व कृषी प्रशासनाच्या अक्षम्य चुकीबद्दल लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाब विचारून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळवून द्यावी."- वामन ईसळ शेतकरी, गणोजा

"अतिवृष्टी मदतीची मागणी करून मदत देण्यात आली नाही. तीनही मंडळातील शेतकऱ्यांना, अतिवृष्टीची मदत देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल."- गोपाल भालेराव, अध्यक्ष, लोक विकास संघटना

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊस