बच्चू कडूंच्या बैठकीवर अभियंत्यांचा बहिष्कार

By Admin | Updated: July 22, 2015 00:35 IST2015-07-22T00:35:42+5:302015-07-22T00:35:42+5:30

आ. बच्चू कडू यांनी रविवारी परतवाडा येथील वाघामाता संस्थानमध्ये आयोजित विद्युत ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात अभियंत्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली.

Boycott boycott on campus meeting | बच्चू कडूंच्या बैठकीवर अभियंत्यांचा बहिष्कार

बच्चू कडूंच्या बैठकीवर अभियंत्यांचा बहिष्कार

अर्वाच्च शिवीगाळ : तक्रार निवारण मेळाव्यातील प्रकार
अचलपूर : आ. बच्चू कडू यांनी रविवारी परतवाडा येथील वाघामाता संस्थानमध्ये आयोजित विद्युत ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात अभियंत्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस वितरण कंपनीचे अभियंताच जबाबदार असून तेच शेतकऱ्यांना त्रास देतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यांना धारेवर धरू, असे वक्तव्य आ. बच्चू कडू यांनी केल्याचा निषेध करीत अभियंता संघटनेने निषेध करीत आमदाराच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.
अचलपूर मतदारसंघातील विद्युत ग्राहक तक्रार निवारण मेळावा परतवाडा येथे रविवारी पार पडला. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सदर मेळाव्यात नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. मेळाव्यासाठी अचलपूर, मोर्शी येथील कार्यकारी अभियंत्यांसह उपविभागातील मोठ्या संख्येने अभियंते उपस्थित होते. शेतकरी वीजग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात येत होते. अशातच आ. बच्चू कडू यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच विद्युत वितरण कंपनीचे अभियंतेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असून त्यांना धारेवर धरले जाईल. शेतकऱ्यांना त्रास देतात. आताची ओव्हरलोडिंगची परिस्थिती अभियंत्यांमुळे आली आहे, असे वक्तव्य भाषणात वारंवार केल्याचे निवेदन सबआॅर्डिनेट इंजिनिअरिंग असोसिएननचे वरिष्ठांना पाठविल्याचे म्हटले आहे. वीज वितरण कंपनीचा अभियंता शेण व घाण खातो. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. तक्रार निवारण मेळाव्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.
भ्रष्ट अभियंत्याला घरात घुसून मारु : बच्चू कडू
अचलपूर : शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वीज कंपनीतील भ्रष्ट शेण खाणाऱ्या अभियंत्यांना घरात घुसून ठोकू, असे वक्तव्य आ. बच्चू कडू यांनी परतवाडा येथे रविवारी आयोजित तक्रार निवारण मेळाव्यात केले.
आपण विद्युत ग्राहक मेळाव्यात एकाही अभियंत्याला बोलावले नव्हते. जिल्ह्यात १७८ डी.बी. ओव्हरलोड आहेत.
जेथे १० कनेक्शन पाहिजे होते तेथे २० देण्यात आलेत. हे शेण कुणी खाल्ले याची चौकशी करावी, असे आ. बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माझ्या शिव्या झोंबत असेल तर शेतकऱ्यांचा जीव जातोय त्याचं काय? येथे माणसं मरत असताना भ्रष्ट अभियंत्यांनी २०११ मध्ये पैसे भरणाऱ्यांना कनेक्शन न देता बिल दिले व २०१२ मध्ये अर्ज करणाऱ्यांना कनेक्शन हा कुठला प्रकार आहे. या सर्व बाबींचे उत्तर मागणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

Web Title: Boycott boycott on campus meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.