शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पश्चिम विदर्भात ‘गोड साखरेची कडू कहाणी’; ११ साखर कारखाने अवसायनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 9:06 PM

Amravati News दोन ते तीन दशकांत पश्चिम विदर्भात ११ साखर कारखान्यांची निर्मिती करण्यात आली. यापैकी नऊ कारखाने आज विपन्नावस्थेत आहेत.

अमरावती : साखरेच्या उत्पादनात विदर्भात एकूणच नन्नाचा पाढा आहे. एकूण २० साखर कारखान्यांपैकी पश्चिम विदर्भात सहकार तत्त्वावरील ११ साखर कारखाने बंद पडल्याने अवसायनात काढण्यात आले आहे. यातील सात कारखान्यांची खासगी उद्योजकांना विक्री करण्यात आलेली आहे. सध्याची स्थिती पाहता ‘गोड साखरेची कडू कहाणी’ असल्याचे चित्र आहे.

दोन ते तीन दशकांत पश्चिम विदर्भात ११ साखर कारखान्यांची निर्मिती करण्यात आली. यापैकी नऊ कारखाने आज विपन्नावस्थेत आहे. पाच साखर कारखान्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारा खासगी उद्योजकांना विक्री करण्यात आलेली आहे. साखर कारखान्यांसाठी पोषक वातावरण निर्मिती पश्चिम विदर्भात झालेली नसल्याचे वास्तव आहे.

याशिवाय शासनासह व्यवस्थापनाची अनास्था, अनियमितता यामुळेच सहकारातील साखर कारखाने कागदोपत्रीच राहिले. एकमेव सुरू असलेला पुसद येथील वसंत सहकारी साखर कारखाना देखील आर्थिक संकटामुळे चार वर्षांपूर्वी बंद पडला व अवसायनात गेला. त्यामुळे सहकार तत्त्वावरील साखर कारखान्यांची चळवळ आता मोडीत निघाली आहे. सद्यस्थितीत खासगी उद्योजकांनी घेतलेल्या डेक्कन व नॅचरल या दोन कारखान्यांत महिनभरापासून गाळप सुरू झाल्याची माहिती प्रादेशिक संचालक (साखर) विभागाने दिली.

हे साखर कारखाने निघाले अवसायनात

जयकिसान, यवतमाळ (२० ऑक्टोबर २०१६ ला अंतिम असायन आदेश), शेतकरी, धामणगाव (२ मे २००२), श्री अंबादेवी, अमरावती (१० मार्च २००६), कोंडेश्वर, अमरावती (२३ मे २००२), शिवशक्ती, बुलडाणा (२३ डिसेंबर २००५), अकोला जिल्हा, अकोला (१५ जानेवारी २०१३), सुधाकरराव नाईक, यवतमाळ (२५ सप्टेंबर २००६), शंकर, यवतमाळ (२५ सप्टेंबर २००६) जिजामाता, बुलडाणा (२ मे २००२), बालाजी, अकोला-वाशिम (२२ मे २००२), वसंत, पुसद देखील अवसायनात निघालेला आहे.

एकूण कारखाने : ११

अवसायनात निघाले : ११

मराप बँकेच्या ताब्यात : ०५

खासगी उद्योजकांना विक्री : ०७

सध्या खासगीत सुरू कारखाने : ०२

गाळप क्षमता (नॅचरल) : १७, ३५९ मे. टन.

कामकाज बंद असल्याने साखर कारखाने बंद अवस्थेत आहेत. यापैकी पाच एमएस बँकेने ताब्यात घेतले आहे. जिजामाता (बुलडाणा) व वसंत (पुसद) कारखाना भाड्याने देण्याचे प्रयत्न होत आहे.

-राजेंद्र दाभेराव, विभागीय सहसंचालक (साखर)

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने