शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

जुलैच्या आपत्तीसाठी मिळणार विम्याचा लाभ

By admin | Updated: August 2, 2016 23:58 IST

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना : प्राथमिक अहवालात ८ हजार हेक्टर बाधितअमरावती : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळते. त्यामुळे जुलै महिन्यात नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जी शेतजमीन खरडून गेली, अशा जमिनीला प्रतिनिधिक निर्देशांकाच्या आधारे अपेक्षित नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम आगाऊ रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात किमान ८ हजार हेक्टर क्षेत्राचा याचा लाभ होणार आहे.जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकाकरिता राबविण्यात येत आहे. या योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या विमा संरक्षणाच्या बाबीमध्ये वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून विमा कंपनीद्वारा महसूल व कृषी विभागाच्या मदतीने नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे.या विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २ आॅगस्टही ही शेवटची तारीख असली तरी ज्या शेतकऱ्यांनी या योजनत सहभाग नोंदविला, त्या शेतकऱ्यांना नदी नाल्यांच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई नुकसान मर्यादेच्या २५ टक्के प्रमाणात मिळणार आहे. यासाठी योजनेत सहभागी शेतकऱ्यांना घटना घडल्यापासून ४८ तासांच्या आत याबाबतची सूचना दिनांक, वेळ, नुकसानीचे कारण, प्रकार, प्रमाण व सर्व्हे नंबरसहीत विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी, महसूल विभाग किंवा कंपनीचे टोल फ्री क्रमांक ०२०-६९०००,फॅक्स क्रमांक ०२०-३०५६५१४३ व टोल फ्री क्रमांक १८००-२७००-४६२ या क्रमांकावर कळवावी लागणार आहे.शेतकऱ्यांनी नूकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ७/१२, पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरलेला पुरावा, विमा कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी विहीत नमुन्यात माहिती सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो. परंतु अर्जातील उर्वरित माहिती ८ दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे अनिवार्य राहील व पीक नुकसानीचा पुरावा म्हणून घेतलेली छायाचित्रे देता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा अनुदान मिळण्याची प्रक्रिया सोयीस्कर होणार आहे. (प्रतिनिधी)अमरावतीत चार हजार हेक्टर बाधितमहसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार १ ते १२ जुलै या कालावधीत आपत्तीमुळे ११ हजार १७ शेतकऱ्यांच्या ७ हजार ८७० हेक्टर क्षेत्राचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते. कापूस, तूर व सोयाबीन पिकाचे हे नुकसान झाले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात सर्वाधिक ४००६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. धामणगाव रेल्वे ६००, भातकुली ८००, अचलपूर ३८०, अंजनगाव २००, दर्यापूर ५००, धारणी १७, चिखलदरा १२, मोर्शी ९११, वरुड ८, चांदूर बाजार ४०० व तिवसा तालुक्यात ४५ हेक्टरमधील पिकांचे पुरामुळे नुकसान झाले आहे.३० दिवसांत मिळणार भरपाईविमा कंपनीद्वारा माहिती प्राप्त झाल्याच्या ४८ तासांत नुकसानीचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठी पर्यवेक्षकाची नियुक्त करण्यात येईल व पुढील १० दिवसांत नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. जर बाधित क्षेत्र हे अधिसूचित विमा क्षेत्राच्या २५ टक्केपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर पात्र शेतकऱ्यांचे नुकसान ठरविण्यात येणार आहे. जर हे क्षेत्र विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त असेल तर या क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी हे काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळण्यास पात्र राहणार आहे.