शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

सावधान! कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती खालावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST

श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरा : वयानुसार प्रत्येक माणसाची झोपेची वेळ ठरली आहे. पुरेशी झोप न झाल्यास तणाव, चिडचिड वाढते. ...

श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरा : वयानुसार प्रत्येक माणसाची झोपेची वेळ ठरली आहे. पुरेशी झोप न झाल्यास तणाव, चिडचिड वाढते. त्याचा विपरीत परिणाम शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर होतो. यातूनच गंभीर आजार होत असल्याचे हजारो उदाहरणे आहेत. किमान सहा तास झोप घेतलीच पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. झोप हेच रोगप्रतिकार शक्तीचे सूत्र तुमचे शरीर सदृढ ठेवते.

अलीकडच्या १५ ते २० वर्षांमध्ये अनेकांच्या कामकाज पद्धतीत मोठा बदल झाला आहे. व्यस्ततेमुळे झोपेकडे दुर्लक्ष होत आहे. पुरेशी झोप न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होत आहे. निरोगी आयुष्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. चुकीची लाईफ स्टाईल, खानपान प्रतिकारशक्ती कमजोर करते. ज्यांची झोप चांगली होते, ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असतात. अनेक लोक आहार व व्यायामासोबतच झोपेची वेळ तंतोतंत पाळतात. त्यामुळे अशा लोकांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असते. उपजत रोगप्रतिकार शक्ती असणे शरीर सुदृढतेसाठी फायद्याचे असते. सातत्याने अपुरी झोप होत असल्यास कालांतराने काही आजार जडण्यास सुरुवात होते. ताणतणाव, चिडचिड वाढते. त्यापासून शरीरामध्ये हार्मोन्सचा स्राव वाढतो, ज्यामुळे इम्युन सिस्टीम कमजोर होते. तेव्हा शरीर उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येकाने आनंदी राहा. झोपेलादेखील तेवढेच महत्त्व द्या, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देतात.

--------------------------------

संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक

प्रत्येकाने संतुलित आहार घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. आपल्याला रोगांपासून सुरक्षित राहता येते. शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे आणि ऊर्जानिर्मिती संतुलित व सकस आहारातून मिळते. दुग्धजन्य पदार्थ ,फळे व पालेभाज्या, स्निग्ध पदार्थ, तृणधान्य व कडधान्य खाल्ले पाहिजे तसेच योगा, ध्यान, प्राणायामदेखील केला पाहिजे. संतुलित आहार आणि व्यायामामुळे शरीर सुदृढ राहते.

---------------------------------

बॉक्स :

अपुऱ्या झोपेचे तोटे...

1) अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड वाढते. नैराश्य येते. रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. त्यानंतर विविध आजार जडतात.

2) अपुरी झोप झाल्यास ॲसिडिटीचा त्रास, भूक न लागणे, हृदयविकाराचा झटका, हाय ब्लडप्रेशर, रक्तातील साखर वाढणे अशा आजारांना आमंत्रण देणारे ठरते.

3) अपुऱ्या झोपेचा परिणाम रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यासह तुमच्या पचनक्रियेवरही होतो.

--------------------------------

बॉक्स : संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक

संतुलित आहार घेतल्यास प्रतिकारशक्ती मजबूत राहते. बऱ्याच रोगांपासून सुरक्षित राहता येते. त्याचप्रमाणे शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे व शरीरात ऊर्जानिर्मितीचे कामदेखील आहारातून मिळते. दुग्धजन्य पदार्थ, फळे, पालेभाज्या, स्निग्ध पदार्थ, तृणधान्ये व कडधान्ये खाल्ले पाहिजे. त्याचबरोबर योगा, ध्यान, प्राणायामालादेखील मोठे महत्त्व आहे. शरीर सुदृढ राहते.

------------------------------