शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

सावधान! कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती खालावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST

श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरा : वयानुसार प्रत्येक माणसाची झोपेची वेळ ठरली आहे. पुरेशी झोप न झाल्यास तणाव, चिडचिड वाढते. ...

श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरा : वयानुसार प्रत्येक माणसाची झोपेची वेळ ठरली आहे. पुरेशी झोप न झाल्यास तणाव, चिडचिड वाढते. त्याचा विपरीत परिणाम शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर होतो. यातूनच गंभीर आजार होत असल्याचे हजारो उदाहरणे आहेत. किमान सहा तास झोप घेतलीच पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. झोप हेच रोगप्रतिकार शक्तीचे सूत्र तुमचे शरीर सदृढ ठेवते.

अलीकडच्या १५ ते २० वर्षांमध्ये अनेकांच्या कामकाज पद्धतीत मोठा बदल झाला आहे. व्यस्ततेमुळे झोपेकडे दुर्लक्ष होत आहे. पुरेशी झोप न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होत आहे. निरोगी आयुष्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. चुकीची लाईफ स्टाईल, खानपान प्रतिकारशक्ती कमजोर करते. ज्यांची झोप चांगली होते, ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असतात. अनेक लोक आहार व व्यायामासोबतच झोपेची वेळ तंतोतंत पाळतात. त्यामुळे अशा लोकांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असते. उपजत रोगप्रतिकार शक्ती असणे शरीर सुदृढतेसाठी फायद्याचे असते. सातत्याने अपुरी झोप होत असल्यास कालांतराने काही आजार जडण्यास सुरुवात होते. ताणतणाव, चिडचिड वाढते. त्यापासून शरीरामध्ये हार्मोन्सचा स्राव वाढतो, ज्यामुळे इम्युन सिस्टीम कमजोर होते. तेव्हा शरीर उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येकाने आनंदी राहा. झोपेलादेखील तेवढेच महत्त्व द्या, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देतात.

--------------------------------

संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक

प्रत्येकाने संतुलित आहार घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. आपल्याला रोगांपासून सुरक्षित राहता येते. शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे आणि ऊर्जानिर्मिती संतुलित व सकस आहारातून मिळते. दुग्धजन्य पदार्थ ,फळे व पालेभाज्या, स्निग्ध पदार्थ, तृणधान्य व कडधान्य खाल्ले पाहिजे तसेच योगा, ध्यान, प्राणायामदेखील केला पाहिजे. संतुलित आहार आणि व्यायामामुळे शरीर सुदृढ राहते.

---------------------------------

बॉक्स :

अपुऱ्या झोपेचे तोटे...

1) अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड वाढते. नैराश्य येते. रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. त्यानंतर विविध आजार जडतात.

2) अपुरी झोप झाल्यास ॲसिडिटीचा त्रास, भूक न लागणे, हृदयविकाराचा झटका, हाय ब्लडप्रेशर, रक्तातील साखर वाढणे अशा आजारांना आमंत्रण देणारे ठरते.

3) अपुऱ्या झोपेचा परिणाम रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यासह तुमच्या पचनक्रियेवरही होतो.

--------------------------------

बॉक्स : संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक

संतुलित आहार घेतल्यास प्रतिकारशक्ती मजबूत राहते. बऱ्याच रोगांपासून सुरक्षित राहता येते. त्याचप्रमाणे शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे व शरीरात ऊर्जानिर्मितीचे कामदेखील आहारातून मिळते. दुग्धजन्य पदार्थ, फळे, पालेभाज्या, स्निग्ध पदार्थ, तृणधान्ये व कडधान्ये खाल्ले पाहिजे. त्याचबरोबर योगा, ध्यान, प्राणायामालादेखील मोठे महत्त्व आहे. शरीर सुदृढ राहते.

------------------------------