शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, भाजी बाजारात जा, पण खिसे सांभाळा!

By admin | Updated: July 29, 2015 00:14 IST

वर्दळीच्या ठिकाणी मोबाईलचोर सक्रिय झाले असून शहरातील इतवारा व शुक्रवार बाजारात सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

वैभव बाबरेकर अमरावतीवर्दळीच्या ठिकाणी मोबाईलचोर सक्रिय झाले असून शहरातील इतवारा व शुक्रवार बाजारात सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. नागरिकांच्या खिशावर हातसफाई करून चोर मोबाईल लंपास करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजारात गेल्यावर सावधान राहून आपले खिसे सांभाळणे आता गरजेचे झाले आहे. आजच्या युगात मोबाईल नागरिकांसाठी खेळ बनला आहे. त्यामुळे सहजरीत्या मोबाईल हाताळण्याची सवय नागरिकांना आहे. मात्र, तरीही चोर हातसफाईची कमाल दाखवून सुज्ञ नागरिकांनाही चकमा देत आहेत. फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चपराशी पुऱ्याजवळ शुक्रवार बाजारात भाजी खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोर नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास केल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शुक्रवार बाजारात दिवसभरात नऊ नागरिकांचे मोबाईल चोरी गेले. त्यात सुधीर गणवीर नामक युवकाने एका अल्पवयीनाला रंगेहात पकडले होते. त्यांची चौकशी करून आणखी दोन आरोपींना अटक केले होते. मात्र, चोरीच्या घटना घडतच आहेत.वर्दळीच्या ठिकाणावरून नागरिकांच्या खिशातील मोबाईल चोरी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सायबर सेलकडून मोबाईल ट्रेस करून पुढील कारवाई संबंधित पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात येते. चोरीचे मोबाईलचे लोकेशन महाराष्ट्राबाहेरचे अनेकदा निदर्शनास येत आहे.कांचन पांडे, एपीआय, सायबर सेल. चोरीच्या मोबाईलची अशी होते विल्हेवाटशहरात अनेक राज्यांतील नागरिक व्यवसाय करण्याकरिता शहरात राहतात. त्यातच काही नागरिक शहरात मोबाईल चोरी करीत असल्याचे शुक्रवार बाजारातील विविध घटनांमुळे उघड झाले होते. अमरावतीमधून चोरी गेलेले मोबाईल बाग्लादेश, नेपाळ व अन्य काही राज्यात विक्री होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान निदर्शनास आले आहे. सहा महिन्यांत सायबर सेलकडे ८७ तक्रारीपोलीस आयुक्तालयातील सायबर सेलकडे जानेवारी ते जूनपर्यंत मोबाईल चोरीच्या ८७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी सायबर सेलने ३५ मोबाईल ट्रेस केले असून आरोपींचे लोकेशन व पुढील कारवाईकरिता संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरातील दहा पोलीस ठाण्यांतर्गत सहा महिन्यांत २०० ते ३०० च्या जवळपास मोबाईल हरविल्याच्या व चोरी गेल्याच्या तक्रारी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.