शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
5
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
6
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
7
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
8
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
9
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
10
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
11
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
12
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
13
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
14
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
15
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
16
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
17
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
18
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
19
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
20
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं

सावधान! मोबाईलचा विरंगुळा ठरतोय विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 1:33 PM

अभ्यास करताना विरंगुळा म्हणून १० ते २० मिनिटे मोबाईल हाताळत असाल, तर आयुष्याच्या टर्निंग पॉइंटसाठी हे घातक ठरणार आहे.

ठळक मुद्देतयारी दहावी-बारावीची टक्केवारीत घट झाल्याचा निष्कर्ष

मोहन राऊतअमरावती: अभ्यास करताना विरंगुळा म्हणून १० ते २० मिनिटे मोबाईल हाताळत असाल, तर आयुष्याच्या टर्निंग पॉइंटसाठी हे घातक ठरणार आहे. हा मोह टाळून आगामी दोन महिने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवतोड मेहनत घ्यावी लागणार असल्याचा सूर बहुतांश पालकांमधून पुढे आला. याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये टक्केवारीत घट होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.निमित्त होते धामणगाव रेल्वेमधील आदर्श महाविद्यालयात आयोजित परिसंवादाचे. दररोज दिवस व रात्री अभ्यासादरम्यान विरंगुळा म्हणून दहा ते वीस मिनिटे अवधी मोबाइलचा वापर विद्यार्थ्यांकडून होतो. यामध्ये अधिकाधिक वेळ निघून जात असल्याचे परिसंवादात पुढे आले. यंदा बारावीत असलेले विद्यार्थी कधीपासून मोबाइल हाताळतात, असा प्रश्न पालकांना करण्यात आला असता, काही विद्यार्थी इयत्ता आठवीपासून, तर काही नववीपासून मोबाइल बाळगत असल्याचे पुढे आले. बहुतांश पालकांनी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या पाल्याला मोबाईल घेऊन दिल्याचे सांगितले.यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेची तयारी शिक्षक व पालक वर्ग विद्यार्थ्या$ंकडून करून घेतली जात आहे.

टक्केवारीत घटजे विद्यार्थी मोबाईल हाताळतात, ते दहावीमध्ये यशस्वी ठरले तरी ते यश व टक्केवारी बारावीच्या परीक्षेत टिकून राहत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे दहावी ते बारावीदरम्यान वाढत्या वयानुसार मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात होतो. गुगलमधून काही पॉइंट सर्च करण्यासाठी पाल्य पालकांकडे मोबाइलचा हट्ट धरतो. अकरावीत घेतलेला मोबाइल बारावीच्या परीक्षेपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या जीवनाचा घटक बनतो. या मोबाइलमुळे दहावीत असलेली टक्केवारी बारावीच्या परीक्षेत टिकत नाही, ही बाब परिसंवादातून पुढे आली.आजारांमध्ये वाढमोबाइलचा अधिक वापर केल्याने आणि काही विशिष्ट पद्धतीने वापर केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, एकाग्रता कमी होणे, नवीन शिकण्याची क्षमता कमी होणे, ग्रहणशक्ती कमी होणे, थकवा येणे, चक्कर येणे, मळमळणे तसेच पोट बिघडण्याचीही शक्यता हे परिणाम प्रामुख्याने दिसून येतात.अल्झायमर, मोतीबिंदूबारा वर्षांवरील मुलांना मोबाइलवर अधिक प्रमाणात गेम्स खेळण्याच्या परिणामी अल्झायमरसारख्या आजारांचाही सामना लागू शकतो. विद्युत चुंबकीय लहरी सतत कानाच्या आसपास पोहोचत असल्याने केवळ कानच नाही, तर आसपासच्या अन्य पेशींवरही परिणाम होतो. तीव्र चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांमध्ये जळजळ व मोतीबिंदूसारखे विकाराचे रुग्ण अमरावती शहरात उपचार घेत असल्याचा सूरदेखील परिसंवादातून निघाला.दहावी व बारावीत असताना मोबाइल वापरू नये. महत्त्वाचे काम असल्यास साधा मोबाइल वापरावा. मोबाइलच्या हव्यासामुळे परीक्षेत टक्केवारी घटत असल्याचा सूर परिसंवादातून पुढे आला आहे.डॉ. वाय.बी. गांडोळेप्राचार्य, आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे

टॅग्स :MobileमोबाइलEducationशिक्षण