शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

सावधान ! जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

By admin | Updated: September 18, 2016 00:18 IST

डेंग्यूचा जिल्ह्यात पुन्हा शिरकाव झाला आहे. गेल्या १५ दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन रुग्णांना दाखल करण्यात आले असून डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क : १५ दिवसांत इर्विनमध्ये दोन रुग्ण दाखलअमरावती : डेंग्यूचा जिल्ह्यात पुन्हा शिरकाव झाला आहे. गेल्या १५ दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन रुग्णांना दाखल करण्यात आले असून डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यात तापसदृश आजाराचे सद्यस्थितीत थैमान सुरु आहे. दररोज शेकडो रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मागील १५ दिवसात ताप आजाराचे हजारांवर रुग्ण दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये २९ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत २९३ तापाचे रुग्ण दाखल करण्यात आले. ३०९ तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले आहे. त्यामध्ये टायफाईटचे ३७ पॉझिटीव्ह आढळून आलेत. त्याचप्रमाणे ५ ते ११ सप्टेंबरपर्यंत ३६१ तापाचे रुग्ण दाखल झाले असून ३३० रुग्णांचे रक्तनमुने तपासणीत ६७ रुग्ण टायफाईटचे पॉझिटीव्ह आढळून आले आहे. दरम्यान या दोन आठवड्यात जिल्ह्यातील विविध भागातून दोन डेंग्यूचे रुग्ण दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षात जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे शंभरावर रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन ते तीन जणांचा मृत्यू देखील झाला होता. आता पुन्हा डेंग्यूचे रुग्ण दाखल होत असल्याचे आढळून आले असून नागरिकांनी सतर्क राहून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सकांसह आरोग्य यंत्रणेने केले आहे. शहरातील सर्वत्र रुग्णालये तापाच्या रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झाली आहे. परिचारिका संसर्गाच्या विळख्याततापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने त्यांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या परिचारिकाच संसर्गाच्या विळख्यात सापडल्या आहेत. एकीकडे परिचारिकांची कमतरता आहे, तर दुसरीकडे वार्डात रुग्णांची संख्या अधिक आहे. या सर्व रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात परिचारिकांची दमछाक होत आहे. काही परिचारिकांना तापाचा संसर्ग झाल्याने त्यांना सुध्दा उपचारांची आवश्यकता भासत आहे.डीएचएफ काय आहेडेंग्यू हेमरेजिक फिवर हे डेंग्यूचे गंभीर रुप आहे. त्यामध्ये सुरुवातीची लक्षणे सामान्य असू शकतात, परंतू काही दिवसांतच हा आजार गंभीर होतो. योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यूची भीती असते. प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होते. रक्तदाब कमी होतो. ह्यदयाचे ठोके वाढतात, नाक, तोंड आणि हिरड्यांमधून रक्त निघते.डेंग्यूची लक्षणेचार ते पाच दिवसापर्यंत ताप राहणे, खुप जास्त डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा वाटणे, काखेत, हातावर, तोंडावर कानावर पुरळ येणे, रक्त निघणे, मळमळ वाटणे, उल्टी येणे व पोट दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. डेंग्यूचे एडिज एजिप्ती डास हे दिवसाच चावतात. डेंग्यू रुग्णांची काळजी कशी घ्यालडेंग्यू सदृश रुग्णाला खाण्यामध्ये जास्तीत जास्त पाणी व द्रव पदार्थ द्यायला पाहिजे. ताप आणि अंगदुखीवर डॉक्टरांच्या सल्याने औषधी घ्यावी, हलके आणि पचेल असे भोजन द्यायला हवे, मच्छर पळविण्याऱ्या रेपेलेंटसचा वापर करायला हवा. काळजी घेणे हाच सर्वाेत्तम उपचार आहे. हे आहेत प्रतिबंधक उपाय मच्छरदाणीचा वापर करा, डासांवर नियंत्रण आणि त्याचे समुळ उच्चाटन हाच प्रभावी उपाय आहे. नागरिकांनी कुठल्याही स्थितीत पाणी जमा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. फुलपॅन्ट आणि पुर्ण बाह्यांचे शर्ट घालावे, डासांना दुर ठेवण्यासाठी अंगाला औषध लावणेही डेंग्युपासून दुर राहण्याचा रामबाण उपाय आहे. याखेरिज प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.