शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

अमरावतीच्या बांबू प्लांटमध्ये विमानाने आली रोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 18:19 IST

अमरावती येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.

- इंदल चव्हाणअमरावती - येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.अमरावती येथील वडाळी तलावानजीक वनविभागांतर्गत बांबू गार्डन नावारूपास आले आहे. तेथे विविध प्रजातीचे बांबू विकसित करण्यात आले आहेत. येथे वनपाल सैयद सलीम यांनी केरळ राज्यातील २२ प्रजातीच्या बांबूंची रोपे आणण्याचा निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात घेतला. यामध्ये बांबूसा डिस्सिम्यूलेटर, बांबूसा टेक्सटिलिस, सेफालोस्टाचाइम फुचसिएनम, सेफालोस्टाचाइम युनानिकस, डायनोचलोआ सॅचेलांदी, गिगांटोचलोआ मांगोने, गिगांटचलोआ व्हर्टिसिल्लाटा, मेलोकातमस कॉम्पॅक्टीफ्लोरस, आॅचलांद्रा तालबोती, आॅचलांद्रा विट्टी, आॅचलांद्रा सेटिगेरा, आॅचलांद्रा ट्राव्हंसोरिया हिरसुता, फिलॉस्ताचिस सल्फ्युरिया, सेउडॉक्सीटेनांथेरा बौर्डीलोलणी, ससा फॉर्क्यी व्हेरिएगेटेड, बांबूसा ब्रोमिश, डेंड्रोकालमस एण्डोमनिका, फिलॉस्टॅचीस व्हेरिगेटेड, व्हेरिगेटेड कलरचेंज या प्रजातीचे बांबूंची मातीविरहित रोपे जवळपास १ क्विंटल वजनाची विमानाने आणावी लागली. ती जिवंत राहावी, यासाठी कमी वेळेत आणणे गरजेचे असल्याने विमानाचा पर्याय निवडल्याचे वनपाल सैय्यद सलीम अहमद यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

आर्द्रतेसाठी उपयुक्तबांबू ही गवताची जात आहे. बांबूची पाने लांब आणि निमुळत्या आकाराची असतात. पाने गळाल्यानंतर जमिनीवर आछादतात. पावसाचे पाणी थेट जमिनीत न शिरता पाना-पानांतून जमिनीत मुरते. जमिनीत ओल असताना वरून पाने असल्याने  उन्हाचा थेट जमिनीवर प्रवेश होत नसल्याने त्या भागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते. त्याचा इतर पिकांनाही फायदा होतो. त्यामुळे शेतकºयांनी नापिकीच्या भागात बांबूची लागवड केल्यास त्याचा लाभ निश्चित होऊ शकेल.

खारपाणपट्ट्यात बांबूची लागवड फायद्याचीमध्यभारतातच खारपाणपट्ट्याची जमीन असून, क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने ते पिकांसाठी अपायकारक ठरते. त्यामुळे अशा जमिनीत भरघोस उत्पन्न मिळू शकत नाही. यावर उपाययोजना म्हणून अशा भागात बांबूची शेती केल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते. तसेच शेताला कुंपण घालण्यासही बांबू उपयुक्त ठरू शकते. बांधावर काटेरी बांबूची लागवड केल्यास कुंपणाचा खर्चही वाचेल आणि बांधापासूनदेखील शेतकºयांना उत्पन्न मिळेल. ही प्रणाली काही शेतकºयांच्या लक्षात आल्याने आता याकडे शेतकºयांचा कल वाढीस लागला आहे.

परराज्यातून आणलेला बांबू येथील वातावरणाशी समरस बनविणे, त्याला महाराष्ट्रीय प्रजातीत रुपांतरण करून तो शेतकºयांना लागवडीसाठी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचा शेतकºयांना लाभ निश्चित होईल.- सैय्यद सलीम अहमद, वनपाल, वडाळी मध्यवती रोपवाटिका.

टॅग्स :Amravatiअमरावती