शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

अमरावतीच्या बांबू प्लांटमध्ये विमानाने आली रोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 18:19 IST

अमरावती येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.

- इंदल चव्हाणअमरावती - येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.अमरावती येथील वडाळी तलावानजीक वनविभागांतर्गत बांबू गार्डन नावारूपास आले आहे. तेथे विविध प्रजातीचे बांबू विकसित करण्यात आले आहेत. येथे वनपाल सैयद सलीम यांनी केरळ राज्यातील २२ प्रजातीच्या बांबूंची रोपे आणण्याचा निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात घेतला. यामध्ये बांबूसा डिस्सिम्यूलेटर, बांबूसा टेक्सटिलिस, सेफालोस्टाचाइम फुचसिएनम, सेफालोस्टाचाइम युनानिकस, डायनोचलोआ सॅचेलांदी, गिगांटोचलोआ मांगोने, गिगांटचलोआ व्हर्टिसिल्लाटा, मेलोकातमस कॉम्पॅक्टीफ्लोरस, आॅचलांद्रा तालबोती, आॅचलांद्रा विट्टी, आॅचलांद्रा सेटिगेरा, आॅचलांद्रा ट्राव्हंसोरिया हिरसुता, फिलॉस्ताचिस सल्फ्युरिया, सेउडॉक्सीटेनांथेरा बौर्डीलोलणी, ससा फॉर्क्यी व्हेरिएगेटेड, बांबूसा ब्रोमिश, डेंड्रोकालमस एण्डोमनिका, फिलॉस्टॅचीस व्हेरिगेटेड, व्हेरिगेटेड कलरचेंज या प्रजातीचे बांबूंची मातीविरहित रोपे जवळपास १ क्विंटल वजनाची विमानाने आणावी लागली. ती जिवंत राहावी, यासाठी कमी वेळेत आणणे गरजेचे असल्याने विमानाचा पर्याय निवडल्याचे वनपाल सैय्यद सलीम अहमद यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

आर्द्रतेसाठी उपयुक्तबांबू ही गवताची जात आहे. बांबूची पाने लांब आणि निमुळत्या आकाराची असतात. पाने गळाल्यानंतर जमिनीवर आछादतात. पावसाचे पाणी थेट जमिनीत न शिरता पाना-पानांतून जमिनीत मुरते. जमिनीत ओल असताना वरून पाने असल्याने  उन्हाचा थेट जमिनीवर प्रवेश होत नसल्याने त्या भागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते. त्याचा इतर पिकांनाही फायदा होतो. त्यामुळे शेतकºयांनी नापिकीच्या भागात बांबूची लागवड केल्यास त्याचा लाभ निश्चित होऊ शकेल.

खारपाणपट्ट्यात बांबूची लागवड फायद्याचीमध्यभारतातच खारपाणपट्ट्याची जमीन असून, क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने ते पिकांसाठी अपायकारक ठरते. त्यामुळे अशा जमिनीत भरघोस उत्पन्न मिळू शकत नाही. यावर उपाययोजना म्हणून अशा भागात बांबूची शेती केल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते. तसेच शेताला कुंपण घालण्यासही बांबू उपयुक्त ठरू शकते. बांधावर काटेरी बांबूची लागवड केल्यास कुंपणाचा खर्चही वाचेल आणि बांधापासूनदेखील शेतकºयांना उत्पन्न मिळेल. ही प्रणाली काही शेतकºयांच्या लक्षात आल्याने आता याकडे शेतकºयांचा कल वाढीस लागला आहे.

परराज्यातून आणलेला बांबू येथील वातावरणाशी समरस बनविणे, त्याला महाराष्ट्रीय प्रजातीत रुपांतरण करून तो शेतकºयांना लागवडीसाठी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचा शेतकºयांना लाभ निश्चित होईल.- सैय्यद सलीम अहमद, वनपाल, वडाळी मध्यवती रोपवाटिका.

टॅग्स :Amravatiअमरावती