शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

खरीपपूर्व लागवडीसाठी बळीराजा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:13 IST

चांदूर बाजार : देशभरात सध्या कोरोना विषाणूचे संकट सुरू आहे. कोरोनाच्या संकटात बळीराजाने हंगामपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. दररोजचे ...

चांदूर बाजार : देशभरात सध्या कोरोना विषाणूचे संकट सुरू आहे. कोरोनाच्या संकटात बळीराजाने हंगामपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. दररोजचे ढगाळ वातावरण पाहता, खरीपपूर्व लागवडीसाठी बळीराजा सज्ज झाला आहे.

खरिपाची सुरुवात मे महिन्यापासून होते. यामुळे मशागतीची कामे बळीराजाला मे महिन्यातच उरकवावी लागतात. मे महिना हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या महिन्यातच बळीराजा आपली पुढील हंगामाची आखणी करून बियाणे खरेदीसह इतर किरकोळ कामे पूर्ण करीत असतो. शेवटच्या आठवड्यात रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बळीराजाचा व्यस्त कार्यक्रम असतो. या कालावधीत त्याला शेतीपूरक कामे व नियोजनाची जुळवाजुळव करावी लागते. अशातच रोहिणी नक्षत्रानंतर बळीराजा हंगामाच्या मशागतीपासून इतर कामांना गती देत असतो. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हामध्ये शेतातील कामे सध्या मोठ्या जोमात सुरू आहेत. अशातच पुढील हंगामातील नियोजनानुसार बियाणे बूकिंग करावे लागते. या कालावधीत बियाणे कोणती विकत घेऊन लागवड करावी, याचासुद्धा अभ्यास करावा लागतो.

सध्या कोरोनाचे संकट देशापुढे उभे आहे. याचे पडसाद शहरांसह ग्रामीण भागातसुद्धा बघावयास मिळत आहे. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तरीही अशा संकटकाळात बळीराजज्जिवाची पर्वा न करता आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम तोंडावर असला तरी सध्या दिवसा उष्णतेचा कहर, तर सायंकाळी व रात्री पावसाचा कहर सुरू असल्याने शेतकरी सकाळच्या सुमारास शेतात जाऊन कामाला महत्त्व देत आहे.

पावसाची र्वदी

रोहिणी नक्षत्राला १५ दिवसानंतर प्रारंभ होणार असला तरी भर उन्हाळाच्या ऋतूत अवकाळी पावसाच्या गारपिटीचा व वादळ वाऱ्याचा कहर सुरू असल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. परंतु आलेल्या संकटाशी सामना करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. निसर्गाच्या वक्रदृष्टीने वेगवेगळे संकट झेलताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असले तरी नव्या दमाने व हिमतीने पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज झालेला आहे.