शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

अवकाळीने २१०० हेक्टरला फटका; गहू, हरभरा, कांद्यासह फळबागांचे नुकसान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 19, 2023 16:40 IST

त्यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यात ६२ हेक्टरमधील गहू, चणा व संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. 

अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून विजांसह वादळ, गारपीट अन् अवकाळी पावसाने २,०५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक १,४९८ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. कृषी विभागाचे कर्मचारी संपात असल्याने महसूल यंत्रणेद्वारा नुकसानीचा नजरअंदाज पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यात ६२ हेक्टरमधील गहू, चणा व संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. 

चिखलदरा तालुक्यात पाऊस व गारपिटीने ४७० हेक्टरमधील गव्हाचे नुकसान झाले. अचलपूर तालुक्यात १९.५० हेक्टरमधील गहू व कांदा तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यात १४९८ हेक्टरमधील कांदा, संत्रा, टरबूज व हरभरा पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

जिल्ह्यात अवकाळी पावसाला १६ मार्चपासून सुरुवात झाली आहे. अजून दोन दिवस, म्हणजेच २१ मार्चपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, रविवारी ढगाळ वातावरण कमी झाले व दिवसभर उघडीप होती.

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊसFarmerशेतकरी