शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

अवकाळीने २१०० हेक्टरला फटका; गहू, हरभरा, कांद्यासह फळबागांचे नुकसान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 19, 2023 16:40 IST

त्यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यात ६२ हेक्टरमधील गहू, चणा व संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. 

अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून विजांसह वादळ, गारपीट अन् अवकाळी पावसाने २,०५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक १,४९८ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. कृषी विभागाचे कर्मचारी संपात असल्याने महसूल यंत्रणेद्वारा नुकसानीचा नजरअंदाज पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यात ६२ हेक्टरमधील गहू, चणा व संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. 

चिखलदरा तालुक्यात पाऊस व गारपिटीने ४७० हेक्टरमधील गव्हाचे नुकसान झाले. अचलपूर तालुक्यात १९.५० हेक्टरमधील गहू व कांदा तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यात १४९८ हेक्टरमधील कांदा, संत्रा, टरबूज व हरभरा पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

जिल्ह्यात अवकाळी पावसाला १६ मार्चपासून सुरुवात झाली आहे. अजून दोन दिवस, म्हणजेच २१ मार्चपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, रविवारी ढगाळ वातावरण कमी झाले व दिवसभर उघडीप होती.

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊसFarmerशेतकरी