गटविकास अधिकाऱ्यांचा रिक्त पदाचा अनुशेष वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:12 IST2021-02-07T04:12:06+5:302021-02-07T04:12:06+5:30

अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालयाचा कारभार हा थ्री टायर सिस्टिमच्या माध्यमातून चालविला जातो. यामध्ये जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीतील दुवा म्हणून ...

The backlog of vacancies of group development officers increased | गटविकास अधिकाऱ्यांचा रिक्त पदाचा अनुशेष वाढला

गटविकास अधिकाऱ्यांचा रिक्त पदाचा अनुशेष वाढला

अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालयाचा कारभार हा थ्री टायर सिस्टिमच्या माध्यमातून चालविला जातो. यामध्ये जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीतील दुवा म्हणून ओळखला जाणाऱ्या पंचायत समितीची भूमिकाही महत्त्वाची आहे. मात्र, याच पंचायत समितीत बीडीओंची १४ पैकी १ आणि सहायक बीडीओंची १० अशी १३ पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कामकाज केले जात आहे.

जिल्ह्यात गटविकास अधिकाऱ्यांची १(बीडीओ) १४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३ पदे रिक्त आहेत. बीडीओंच्या सोबतीला सहायक गटविकास अधिकारी (ऐबीडीओ)चीसुध्दा पंचायत समितीत १४ आणि रोहयो विभागात १ व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून १ अशी १६ पदे आहेत. मात्र, त्यातील १० पदे रिक्त असल्यामुळे जिल्हाभरात ११ बीडीओ नियमित असले तरी विभागाच्या मुख्यालयी पंचायत समितीसह वरूड आणि चांदूर रेल्वे येथे ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यावर कारभार सुरू आहे. याशिवाय अमरावती, भातकुली, चिखलदरा, चांदूर बाजार, मोशी, वरूड, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्र्वर आणि रोहयो विभागातील सहायक बीडीओंची पदे रिक्त आहेत. या अधिकाऱ्यांची कामेही प्रभारीवर सुरू आहेत. एकंदरीत १४ पंचायत समितीतील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा अनुशेष एक ते दोन वर्षापासून कायम असल्याने प्रभारीवर काम भागविले जात आहे. ज्यांचेकडे अतिरिक्त भार दिला जात आहे. त्याच्या मुळ कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याने सर्वसामन्यांना याचा फटका बसत आहेत. त्यामुळे बीडीओंच्या रिक्त पदाचा अनुशेष शासन कधी भरून काढणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

बॉक़्स

शासनाकडे पाठपुुरावा, दखल मात्र नाही

जिल्हाभरातील पंचायत समितीतील गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. ही पदे भरण्यात यावी याकरिता जिल्हा परिषद पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने जिल्ह्यातील बीडीओंच्या रिक्त पदाचा अनुशेष कायम आहे. ही रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी हाेत आहे.

Web Title: The backlog of vacancies of group development officers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.