शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महानगरपालिकेत मनुष्यबळाचा ‘बॅकलॉग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:37 IST

आठ लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महापालिका यंत्रणेसमोर मनुष्यबळाचा बॅकलॉग भरून काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या व त्या तुलनेत कामाची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाला मात्र, उपलब्ध मनुष्यबळाकडून काम करून घेण्याची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्दे८२७ पदे रिक्त : पदोन्नतीत सेवा प्रवेश नियमांचा अडसर

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठ लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महापालिका यंत्रणेसमोर मनुष्यबळाचा बॅकलॉग भरून काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या व त्या तुलनेत कामाची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाला मात्र, उपलब्ध मनुष्यबळाकडून काम करून घेण्याची कसरत करावी लागत आहे. दरवर्षी वाढत चाललेला आस्थापना खर्च आणि उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोतामुळे महापालिकेला मर्यादा आल्या आहेत. महापालिकेच्या आस्थापना खर्चात कपात करून उत्पन्नवृद्धी होत नाही, तोपर्यंत शासन हा रिक्त पदांचा अनुशेष भरून काढणार नसल्याने यंत्रणेसमोर संकटच निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे महापालिका प्रशासनाला अल्प मनुष्यबळातच महापालिकेचा गाडा हाकावा लागणार असल्याचे वास्तव आहे.सन १९८३ मध्ये अमरावती महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर सन १९९२ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन लोकनियुक्त महापालिका अस्तिवात आली. नगरविकास विभागाकडून अमरावती महापालिकेला ‘ड’ वर्ग संवर्ग मिळाला. लोकसंख्या, क्षेत्रफळ, आर्थिक स्त्रोत व त्याची वसुली, पायाभूत सुविधा या बाबी विचारात घेऊन महानगरपालिकांचे अ, ब, क आणि 'ड' अशा चार वर्गात वर्गीकरण करण्यात आले. त्यानुसार अमरावती महापालिकेला आकृतीबंध निश्चित करण्यात आला. शासननिर्णयानुसार पदसंख्या निश्चित करण्यात आली. मात्र, आस्थापना खर्चात झालेली भरमसाठ वाढ लक्षात घेता मागील काही वर्षांपासून शासनाने नव्या पदभरतीवर अंकुश लावला, तर अ आणि ब वर्गातील अधिकारी महानगरपालिकेत पाठविले नाहीत. त्यामुळे उपायुक्तांसह सहायक आयुक्त व अन्य महत्त्वपूर्ण पदाचा कारभार महापालिका आस्थापनेवर असलेल्या अधिकारी कर्मचाºयांवर सुरु आहे. अनेक मोठी पदे रिक्त असून त्या पदांचा तात्पुरता कार्यभार तुलनेत निम्न दर्जाच्या कर्मचाºयांकडे देण्यात आला आहे.विशेष म्हणजे तात्पुरत्या प्रभारालाही १०-१५ वर्षे होऊन गेल्याने प्रभारातही मोनोपल्ली झाली आहे, तर दुसरीकडे महापालिकेचे सेवाप्रवेश नियम निश्चित नसल्याने पदोन्नतीही रखडली आहे.२,४१५ पैकी १,५८८ कार्यरतमहापालिकेत अ,ब,क आणि ड या चार वर्गांची २४१५ पदे मंजूर आहेत. त्यापेैकी एप्रिल २०१८ पर्यंत १५८८ अधिकारी कर्मचारी कार्यरत असून ८२७ पदांचा अनुशेष आहे. २४१५ एकूण मंजूर पदांपैकी ३१७ पदे तांत्रिक व २०९८ पदे अतांत्रिक सेवेत मोडणारी आहेत. अर्थात तूर्तास महापालिकेत मंजूर पदांच्या तुलनेत कार्यरत पदांची टक्केवारी ६५ अशी आहे. महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवल्यासच महापालिकेला नवीन पदभरती करणे शक्य आहे.