शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांना 'लेटरबॉम्ब'; 'या' ८ मुद्द्यांवर बैठक घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 12:09 PM

केरळच्या धर्तीवर अराजपत्रित पदभरती करा, ७२०० पोलीस भरतीची जाहिरात काढा, बच्चू कडूंची मागणी

अमरावती : केरळ राज्याच्या धर्तीवर एमपीएससीच्या कक्षाबाहेरील वर्ग २ अराजपत्रित आणि वर्ग ३, ४ ची पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात यावी. सन २०१८ मध्ये एमपीएससी मुख्यालय बांधकामाबाबत निर्णय झालेला आहे. तथापि, काही तांत्रिक अडचणीमुळे रखडलेली प्रक्रिया पूर्ण करून मुख्यालयाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू करावी. एमपीएससीचे रिक्त दोन सदस्य भरण्यात यावे, या आशयाचे पत्र गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी दिले.

आमदार कडू यांनी गत आठवड्यात अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, समस्या मांडताना तडाखेबाज भाषण केले. आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आहेत. मात्र, त्यांनी सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देत सरकारची विकेट घेण्याचा प्रयत्न केला, हे विशेष.

आमदार कडू यांचा सभागृहातील ‘प्रहार’ शमत नाही तोच गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना ८ विषयांवर मागण्यांसाठी पत्र दिले आहे. एवढेच नव्हे तर यासंदर्भात बैठकीबाबत अवगत केले आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू हे सरकारमध्ये असो वा विरोधात ‘अपना भिडू, बच्चू कडू’ या म्हणीनुसार सामान्य व्यक्तीची बाजू मांडण्यासाठी ते कोणतीही संधी सोडत नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रात हे आहेत आठ मुद्दे

  • केरळ राज्याच्या धर्तीवर एमपीएससीच्या कक्षाबाहेरील वर्ग २ अराजपत्रित आणि वर्ग ३, ४ ची पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात यावी.
  • राज्य शासनाने ७२०० पोलीस भरतीची घोषणा केली, आता जाहिरात प्रसिद्ध करावी.
  • जिल्हा परिषद, एमआयडीसी, पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य सेवकांची २०१९ ची रखडलेली पदभरती करावी.
  • भूमी अभिलेख विभागाच्या गट क पदांच्या १०१३ जागांच्या परीक्षा तत्काळ घ्याव्यात.
  • सहायक आयुक्त (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी गट ब संदर्भात एमपीएससी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करावी.
  • कोरोना काळात एक वेळची विशेष बाब म्हणून परीक्षांचा कालावधी वाढवून देण्याविषयी शासनादेश निर्गमित करावा.
  • दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ नुसार सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये दिव्यांगांचा विचार करावा.
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ मधील पात्र ११४५ उमेदवारांची चारित्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी अधीन नेमणुका देण्यात याव्यात.

 

आमदार, मंत्रिपद हे लोकसेवेसाठी आहे. ते काही मिरवण्याचे साधन नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मी समाजसेवा त्यानंतर राजकारणात आलो आहे. पद असो किंवा नसो. माझा पिंड हा लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे आणि ते शेवटपर्यंत मांडणारच. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन बैठक घेण्याचे कळविले आहे.

- बच्चू कडू, आमदार

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूGovernmentसरकारEknath Shindeएकनाथ शिंदे