महाआवास अभियानात चिखलदऱ्याला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST2021-09-02T04:27:58+5:302021-09-02T04:27:58+5:30
शहापूर, आडनदी, बामादेही, मोथा गौलखेडा चा समावेश कॅप्शन - ग्रामपंचायतींना पुरस्कार देताना आ. राजकुमार पाटेल, वासंती मंगरोळे, प्रकाश पोळ) ...

महाआवास अभियानात चिखलदऱ्याला पुरस्कार
शहापूर, आडनदी, बामादेही, मोथा गौलखेडा चा समावेश
कॅप्शन - ग्रामपंचायतींना पुरस्कार देताना आ. राजकुमार पाटेल, वासंती मंगरोळे, प्रकाश पोळ)
चिखलदरा : महाआवास अभियान (ग्रामीण) पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी पंचायत समिती सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. राजकुमार पटेल, सभापती बन्सी जामकर, जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे, बीडीओ प्रकाश पोळ आदींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. केंद्र पुरस्कृत उत्कृष्ट ग्रामपंचायत योजनेत
शहापूर, बामदेही, मोथा तसेच राज्य पुरस्कृत योजनेत आडनदी, गौरखेडा बाजार, बदनापूर या ग्रामपंचायतींनी प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकावले. २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीतील हा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट घरकुल (केंद्र शासन पुरस्कृत) लाभार्थी म्हणून देवेंद्र येवले (रा. दहेन्द्री), शारदा राऊत (रा. काटकुंभ), फकीरजी शनवारे (रा. मोथा) यांना पुरस्कृत करण्यात आले. सर्वोत्कृष्ट घरकुल लाभार्थी (राज्य पुरस्कार) सतीश तायडे, सोमलाल बेलसरे, रतन पिपरदे हे ठरले. जगत शनवारे, राजेश सेमलकर, देविदास कोगे, कमलेश राठौर, मोंग्या बेठेकर, रोहित कंगाले व विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य व प्रहार कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
-----------------ग्रामपंचायत स्तरावर शासकीय योजना योग्यप्रकारे राबविण्यासाठी पदाधिकारी प्रशासनाच्या समन्वयाने कार्य करतात. योजना यशस्वी व लाभार्थींपर्यंत पोहोचत असल्याने त्यांचा गुणगौरव होत आहे.
- वासंती मंगरोळे, जिल्हा परिषद सदस्य,
चिखली