शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लिफ्ट मागणे बेतले जिवावर, जावयाचा मृत्यू; अमरावती जिल्ह्यातील भीषण अपघाताचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 22:20 IST

Amravati News सोमवार दि. १० जानेवारी रोजी रात्री अमरावती जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. यात एक व्यक्ती आपल्या सासरी आला होता व लिफ्ट मागून गावी जात होता.

ठळक मुद्देअपघातात ठार झालेल्या तिघांवर परतवाड्यात, एकावर जळगावात अंत्यसंस्कार

अमरावती : अकोट-शेगाव मार्गावर दि. १० जानेवारी रोजी रात्री अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चौघांवर आपापल्या गावी मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांवर परतवाडानजीक एकलासपूर येथे, तर लिफ्ट मागून गावी जाण्यासाठी निघालेल्या तेथील जावयावर जळगाव येथे त्यांच्या गावी अंत्यसंस्कार पार पडले.

चालक अंकुश प्रल्हाद दिवटे (३०, रा. एकलासपूर, ता. अचलपूर), अक्षय ऊर्फ विकी अशोक अवघड (२८, रा. तांबेनगर, परतवाडा) व आकाश अवधूत कुकडे (२९, रा. गुरुकुल कॉलनी, परतवाडा), तर घनश्याम चावरे (रा. जळगाव) अशी मृतांची नावे आहे. तिघे शेगाव येथे जाण्यासाठी सोमवारी सायंकाळी एमएच २७ एआर ९७९६ क्रमांकाच्या चारचाकीने परतवाड्याहून निघाले होते अंकुश दिवटे चालक असून, त्याच्या ताब्यातील चारचाकी ऋषभ जयंत जयसिंगपुरे (रा. चिखलदरा स्टॉप, परतवाडा) यांच्या मालकीची आहे. अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळीच चौघांचा मृत्यू झाला. अपघातातील दगावलेले अचलपूर तालुक्यातील तीनही युवक अविवाहित होते.

ओळखीची लिफ्ट जिवावर बेतली

जळगाव येथील घनश्याम चावरे हे परतवाडा येथे सासरी आले होते. सोमवारी सायंकाळी त्यांना परतायचे होते. एसटीचा संप असल्याने त्यांना युवकांसोबत चारचाकीत पाठविण्यात आले. अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. परतवाडा येथील गोपाल तिवाण (रा. छोटा बाजार परिसर) यांचे ते जावई होते.

तिघांवर अंत्यसंस्कार

खासगी चालक अंकुश दिवटे याच्या पश्चात एक भाऊ, बहीण, वडील आहेत. परतवाडा-चिखलदरा मार्गावरील एकलासपूर येथे सायंकाळी चार वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. आकाश कुकडे हा परतवाडा बस स्थानकापुढे पानटपरी चालवित होता. वडील महामंडळात चालक आहेत. मोठा विवाहित भाऊ पुण्याला राहतो. अक्षय ऊर्फ विकी अवघड फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होता. त्याचे वडील वनविभागातून लॉगिन युनिट येथून चालकपदावरून सेवानिवृत्त झाले. या दोघांवर परतवाड्यात अंत्यसंस्कार झाले.

असा झाला अपघात

परतवाड्याहून शेगावकडे जात असताना देवरीफाटा ते रौंदळा मार्गावरील खड्ड्यांमुळे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. ही घटना सोमवार दि.१० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

 रात्रीच्या सुमारास रौंदळ्या फाट्यानजीक खड्डेमय रस्त्यामुळे कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार ही झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चौघे जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला. 

 

 

 

टॅग्स :Accidentअपघात