शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

लिफ्ट मागणे बेतले जिवावर, जावयाचा मृत्यू; अमरावती जिल्ह्यातील भीषण अपघाताचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 22:20 IST

Amravati News सोमवार दि. १० जानेवारी रोजी रात्री अमरावती जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. यात एक व्यक्ती आपल्या सासरी आला होता व लिफ्ट मागून गावी जात होता.

ठळक मुद्देअपघातात ठार झालेल्या तिघांवर परतवाड्यात, एकावर जळगावात अंत्यसंस्कार

अमरावती : अकोट-शेगाव मार्गावर दि. १० जानेवारी रोजी रात्री अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चौघांवर आपापल्या गावी मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांवर परतवाडानजीक एकलासपूर येथे, तर लिफ्ट मागून गावी जाण्यासाठी निघालेल्या तेथील जावयावर जळगाव येथे त्यांच्या गावी अंत्यसंस्कार पार पडले.

चालक अंकुश प्रल्हाद दिवटे (३०, रा. एकलासपूर, ता. अचलपूर), अक्षय ऊर्फ विकी अशोक अवघड (२८, रा. तांबेनगर, परतवाडा) व आकाश अवधूत कुकडे (२९, रा. गुरुकुल कॉलनी, परतवाडा), तर घनश्याम चावरे (रा. जळगाव) अशी मृतांची नावे आहे. तिघे शेगाव येथे जाण्यासाठी सोमवारी सायंकाळी एमएच २७ एआर ९७९६ क्रमांकाच्या चारचाकीने परतवाड्याहून निघाले होते अंकुश दिवटे चालक असून, त्याच्या ताब्यातील चारचाकी ऋषभ जयंत जयसिंगपुरे (रा. चिखलदरा स्टॉप, परतवाडा) यांच्या मालकीची आहे. अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळीच चौघांचा मृत्यू झाला. अपघातातील दगावलेले अचलपूर तालुक्यातील तीनही युवक अविवाहित होते.

ओळखीची लिफ्ट जिवावर बेतली

जळगाव येथील घनश्याम चावरे हे परतवाडा येथे सासरी आले होते. सोमवारी सायंकाळी त्यांना परतायचे होते. एसटीचा संप असल्याने त्यांना युवकांसोबत चारचाकीत पाठविण्यात आले. अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. परतवाडा येथील गोपाल तिवाण (रा. छोटा बाजार परिसर) यांचे ते जावई होते.

तिघांवर अंत्यसंस्कार

खासगी चालक अंकुश दिवटे याच्या पश्चात एक भाऊ, बहीण, वडील आहेत. परतवाडा-चिखलदरा मार्गावरील एकलासपूर येथे सायंकाळी चार वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. आकाश कुकडे हा परतवाडा बस स्थानकापुढे पानटपरी चालवित होता. वडील महामंडळात चालक आहेत. मोठा विवाहित भाऊ पुण्याला राहतो. अक्षय ऊर्फ विकी अवघड फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होता. त्याचे वडील वनविभागातून लॉगिन युनिट येथून चालकपदावरून सेवानिवृत्त झाले. या दोघांवर परतवाड्यात अंत्यसंस्कार झाले.

असा झाला अपघात

परतवाड्याहून शेगावकडे जात असताना देवरीफाटा ते रौंदळा मार्गावरील खड्ड्यांमुळे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. ही घटना सोमवार दि.१० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

 रात्रीच्या सुमारास रौंदळ्या फाट्यानजीक खड्डेमय रस्त्यामुळे कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार ही झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चौघे जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला. 

 

 

 

टॅग्स :Accidentअपघात