शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

लिफ्ट मागणे बेतले जिवावर, जावयाचा मृत्यू; अमरावती जिल्ह्यातील भीषण अपघाताचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 22:20 IST

Amravati News सोमवार दि. १० जानेवारी रोजी रात्री अमरावती जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. यात एक व्यक्ती आपल्या सासरी आला होता व लिफ्ट मागून गावी जात होता.

ठळक मुद्देअपघातात ठार झालेल्या तिघांवर परतवाड्यात, एकावर जळगावात अंत्यसंस्कार

अमरावती : अकोट-शेगाव मार्गावर दि. १० जानेवारी रोजी रात्री अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चौघांवर आपापल्या गावी मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांवर परतवाडानजीक एकलासपूर येथे, तर लिफ्ट मागून गावी जाण्यासाठी निघालेल्या तेथील जावयावर जळगाव येथे त्यांच्या गावी अंत्यसंस्कार पार पडले.

चालक अंकुश प्रल्हाद दिवटे (३०, रा. एकलासपूर, ता. अचलपूर), अक्षय ऊर्फ विकी अशोक अवघड (२८, रा. तांबेनगर, परतवाडा) व आकाश अवधूत कुकडे (२९, रा. गुरुकुल कॉलनी, परतवाडा), तर घनश्याम चावरे (रा. जळगाव) अशी मृतांची नावे आहे. तिघे शेगाव येथे जाण्यासाठी सोमवारी सायंकाळी एमएच २७ एआर ९७९६ क्रमांकाच्या चारचाकीने परतवाड्याहून निघाले होते अंकुश दिवटे चालक असून, त्याच्या ताब्यातील चारचाकी ऋषभ जयंत जयसिंगपुरे (रा. चिखलदरा स्टॉप, परतवाडा) यांच्या मालकीची आहे. अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळीच चौघांचा मृत्यू झाला. अपघातातील दगावलेले अचलपूर तालुक्यातील तीनही युवक अविवाहित होते.

ओळखीची लिफ्ट जिवावर बेतली

जळगाव येथील घनश्याम चावरे हे परतवाडा येथे सासरी आले होते. सोमवारी सायंकाळी त्यांना परतायचे होते. एसटीचा संप असल्याने त्यांना युवकांसोबत चारचाकीत पाठविण्यात आले. अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. परतवाडा येथील गोपाल तिवाण (रा. छोटा बाजार परिसर) यांचे ते जावई होते.

तिघांवर अंत्यसंस्कार

खासगी चालक अंकुश दिवटे याच्या पश्चात एक भाऊ, बहीण, वडील आहेत. परतवाडा-चिखलदरा मार्गावरील एकलासपूर येथे सायंकाळी चार वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. आकाश कुकडे हा परतवाडा बस स्थानकापुढे पानटपरी चालवित होता. वडील महामंडळात चालक आहेत. मोठा विवाहित भाऊ पुण्याला राहतो. अक्षय ऊर्फ विकी अवघड फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होता. त्याचे वडील वनविभागातून लॉगिन युनिट येथून चालकपदावरून सेवानिवृत्त झाले. या दोघांवर परतवाड्यात अंत्यसंस्कार झाले.

असा झाला अपघात

परतवाड्याहून शेगावकडे जात असताना देवरीफाटा ते रौंदळा मार्गावरील खड्ड्यांमुळे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. ही घटना सोमवार दि.१० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

 रात्रीच्या सुमारास रौंदळ्या फाट्यानजीक खड्डेमय रस्त्यामुळे कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार ही झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चौघे जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला. 

 

 

 

टॅग्स :Accidentअपघात