शाळांकडून शुल्कासाठी तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:13 IST2021-02-13T04:13:46+5:302021-02-13T04:13:46+5:30
राजुरा बाजार : कोरोना काळात भारत बंद दरम्यान शाळा, महाविद्यालयेदेखील बंदच होती. तेव्हा शाळेने आकारलेले शुल्क कमी करून ...

शाळांकडून शुल्कासाठी तगादा
राजुरा बाजार : कोरोना काळात भारत बंद दरम्यान शाळा, महाविद्यालयेदेखील बंदच होती. तेव्हा शाळेने आकारलेले शुल्क कमी करून शाळा व्यवस्थापनाने पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी समोर आली आहे.
शाळेला पर्याय म्हणून ऑनलाईन क्लासेस सुरू झालेत. त्यासाठी पालकांनाच अँड्रॉइड मोबाईलपासून इंटरनेटपर्यंत सर्व व्यवस्था करावी लागली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचीच मुले वरूडच्या महाविद्यालयात, कॉन्व्हेंटमध्ये शिकत आहे. यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची आहे. अशा वेळी वरूड येथील शाळांकडून दिलासा तर सोडाच जबरी वसुली चालविली आहे. शुल्क न भरल्यास परीक्षेला बसू न देण्याची धमकी विद्यार्थ्यांना देण्यात आली. अशी तक्रार अनेक पालकांनी केली आहे.
कोट
लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा बंद असताना वसुली कशी? शेतीचे बेहाल आहेत. शेतकऱ्यांचीच मुले वरुडच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. अशा बिकट परिस्थितीत शाळा व्यवस्थापनाने सर्व शुल्कात किमान ५० टक्के तरी दिलासा द्यावा.
- नितीन बहुरुपी
अध्यक्ष, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस