शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी-वन कर्मचाऱ्यांमध्ये पुनर्वसनावरून सशस्त्र हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 06:43 IST

पुनर्वसित गावांमध्ये सरकारकडून उपेक्षा झाल्यानंतर पुन्हा मेळघाटातील मूळ गावांमध्ये परतण्याच्या तयारीत असलेले आदिवासी व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी दुपारी २ वाजता मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात सशस्त्र संघर्ष झाला.

चिखलदरा/अकोट : पुनर्वसित गावांमध्ये सरकारकडून उपेक्षा झाल्यानंतर पुन्हा मेळघाटातील मूळ गावांमध्ये परतण्याच्या तयारीत असलेले आदिवासी व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी दुपारी २ वाजता मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात सशस्त्र संघर्ष झाला. यामध्ये राज्य पोलीस व राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) १५ जवान, वन विभागाचे ५० कर्मचारी आणि १० ते १५ आदिवासी जखमी झाल्याची माहिती आहे. सदर परिसर हा दुर्गम असल्याने नेमके चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मागील आठ ते दहा दिवसांपासून व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात प्रवेश घेण्याच्या तयारीत जवळपास दोनशे आदिवासी गुल्लरघाट जंगलात, केलपाणी परिसरात उघड्यावर ठाण मांडून बसले आहेत.व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात येत असलेल्या अमोणा, बारुखेडा, धारगड, सोमठाणा बुद्रुक, सोमठाणा खुर्द, गुल्लरघाट, केलपाणी, नागरतास गावांचे पुनर्वसन आदिवासी ग्रामस्थांना मान्य नाही. बँक खात्यावर पैसे आणि जमिनींचे सातबारे द्या, अशी त्यांची मागणी आहे. १५ जानेवारी रोजी काही गावकरी मेळघाटमधील आपल्या मूळ गावी परतले. मंगळवारी दुपारी पोलिस, एसआरपीएफ व वनविभागाचे १०० पेक्षा अधिक कर्मचारी आदिवासींची समजूत काढण्यासाठी आले असता, त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ग्रामस्थांनी दगड, तिर कमठा, गोफण, काठ्या व मिरची पावडरने सुरक्षा दलाच्या जवांनावर हल्ला केला. सुमारे ३०० ग्रामस्थांनी अचानक चढविलेल्या हल्ल्यामुळे गांगारुन गेलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनीही त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. या सशस्त्र संघर्षात वनविभागाचे ५० जवान जखमी झाले, तर १५ पोलिस कर्मचारी जखमी झाले. १५ वाहनांची तोडफोड करण्यात आली. जखमी जवानांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयासह अकोला व अमरावतीस हलविण्यात आले आहे. धारगडचे आरएफओ सुनिल वाकोड हे गंभीर जखमी झाले आहेत. वनपाल इंगोले यांच्यावर कुºहाडीने हल्ला झाल्याने त्यांच्या पाठीवर खोल घाव झाला आहे. अनेक कर्मचाºयांच्या मानेवर, पाढीवर, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अनेकांची डोकी फुटल्याची माहिती आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.जखमी झालेल्या कर्मचा-यांची नावेरामेश्वर आडे, अविनाश गजबे, विवेक येवतकर, संजीव इंगोले या वनपालांच्या पाठीवर कुºहाडीने वार करण्यात आले. त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. याशिवाय नितीन राऊत, श्याम देशमुख, श्रीकृष्ण पारस्कर, आर. एच. सावलकर, सुनील वाकोडे (आरएफओ) हे वन कर्मचारी, अधिकारी जखमी आहेत. तर एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक राजू वाघमारे, पोलीस कर्मचारी शंकर डाखोडे, हेमंत मोहन सरकटे, संदीप वाकोडे, कैलास वाकोडे, आनंद पवित्रकार, शेखर तायडे यांचा जखमींमध्ये समावेश आहे. याशिवाय वनपाल पवन बावनेर, वन विभागाचे एस. डी. जामकार, एस. जी. माने, एस. एस. सावंत, दिनेश केंद्रे, एम. आर. राठोड, हिंमत खाडवाये यांचा जखमीत समावेश असल्याची माहिती वन विभागाने दिली.परिस्थिती तणावपूर्णआदिवासी, पोलीस व वन सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या या सशस्त्र संघर्षानंतर केलपाणी, गुल्लरघाट परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. अमरावती येथील पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळावर दाखल झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी, मेळघाटचे वनपरिक्षेत्रअधिकारी विशाल माळी हे घटनास्थळावर ठाण मांडून आहेत.>समजून घेण्यात कमी पडलोआदिवासींचे म्हणणे समजून घेण्यात आम्ही कमी पडलो की, काही राजकीय मंडळींनी आदिवासींना चिथावणी दिल्यामुळे हा प्रकार घडला, याची चौकशी करण्याचे आदेश अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक व वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांना दिले आहेत.- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री>जंगलाला आग लावली : वन व पोलीस कर्मचाºयांवर हल्ला केल्यानंतर पुनर्वसित ग्रामस्थांनी जंगलाला आग लावली. हा परिसर व्याघ्र प्रकल्पात मोडत असून मोठी वनसंपदा नष्ट झाली आहे.>परिसराला छावणीचे स्वरूप : गेल्या आठ दिवसांपासून २०० पोलीस, २०० वन कर्मचारी व ११२ एसआरपीएफचे जवान केलपाणी परिसरात आहेत. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.