शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Election 2019 : आघाडीच्या जाहीरनाम्यात चंद्रावर प्लॉट देणेच बाकी- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 19:24 IST

आघाडीने जाहीरनाम्यात जगातील सर्वच आश्वासने देऊन टाकली. फक्त ताजमहाल बांधून देऊ किंवा चंद्रावर प्लॉट देऊ, एवढेच काय ते राहून गेले आहे.

दर्यापूर : आघाडीने जाहीरनाम्यात जगातील सर्वच आश्वासने देऊन टाकली. फक्त ताजमहाल बांधून देऊ किंवा चंद्रावर प्लॉट देऊ, एवढेच काय ते राहून गेले आहे. पाच वर्षांत सर्वच प्रश्न सुटले किंवा शिल्लकच नाहीत, असा दावा आपण करणार नाही; मात्र आघाडी सरकारने १५ वर्षांत काय कामे केलीत, याचा हिशेब द्यावा, आम्ही पाच वर्षांचा हिशेब देतो, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते शनिवारी स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली. या निवडणुकीत कुठेही चुरस राहिलेली नाही. लहान मुलांना जरी विचारले तरी ते सांगतील की, महाराष्ट्रात भाजप-सेना महायुतीचेच सरकार येणार आहे. जागा २२० की २४० हाच प्रश्न आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसची अवस्था राहुल गांधींना ज्ञात आहे. कितीही डोके आदळले तरी आपल्याला महाराष्ट्रात जागा मिळत नाहीत. म्हणून ते बँकॉकला निघून गेले आहेत. त्यांना राज्यात तोंड दाखवायलाही जागी उरली नसल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष खाली होण्याच्या मार्गावर आहे. मैदानात आता कोणी राहिले नाही. आमचे पैलवान तेल लावून आहेत. आता भारतीय जनता पक्षाला स्पर्धकच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.५० लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. पात्र शेतक-यांना जोपर्यंत लाभ मिळणार नाही, तोपर्यंत योजना सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडीने शेतक-यांना १५ वर्षांमध्ये २०  हजार कोटींचे अनुदान दिले. आम्ही पाच वर्षांत ५० हजार कोटींचे अनुदान शेतक-यांना दिले आहे. राज्यातील १४० प्रकल्पांचे कामे पाच वर्षांत पूर्णत्वास गेल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे व उमेदवार उपस्थित होते. ------------------तापी रिचार्जमुळे सिंचनाची सुविधाजिल्ह्यातील तापी मेघा रिचार्ज प्रकल्पासाठी सहा हजार कोटींच्या आराखड्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रकल्प समोर जाईल. यामुळे शेतक-यांना सिंचनाची मोठी सोय होणार आहे. खारपाणपट्ट्यालाही सिंचनाचा लाभ होणार असल्याचा उल्लेख करीत, दर्यापूर तालुक्यातील तब्बल 1700 शेततळी पूर्ण झाली आहेत; राज्यात दर्यापूर तालुक्याने रेकॉर्ड केला असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019