शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Maharashtra Election 2019 : आघाडीच्या जाहीरनाम्यात चंद्रावर प्लॉट देणेच बाकी- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 19:24 IST

आघाडीने जाहीरनाम्यात जगातील सर्वच आश्वासने देऊन टाकली. फक्त ताजमहाल बांधून देऊ किंवा चंद्रावर प्लॉट देऊ, एवढेच काय ते राहून गेले आहे.

दर्यापूर : आघाडीने जाहीरनाम्यात जगातील सर्वच आश्वासने देऊन टाकली. फक्त ताजमहाल बांधून देऊ किंवा चंद्रावर प्लॉट देऊ, एवढेच काय ते राहून गेले आहे. पाच वर्षांत सर्वच प्रश्न सुटले किंवा शिल्लकच नाहीत, असा दावा आपण करणार नाही; मात्र आघाडी सरकारने १५ वर्षांत काय कामे केलीत, याचा हिशेब द्यावा, आम्ही पाच वर्षांचा हिशेब देतो, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते शनिवारी स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली. या निवडणुकीत कुठेही चुरस राहिलेली नाही. लहान मुलांना जरी विचारले तरी ते सांगतील की, महाराष्ट्रात भाजप-सेना महायुतीचेच सरकार येणार आहे. जागा २२० की २४० हाच प्रश्न आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसची अवस्था राहुल गांधींना ज्ञात आहे. कितीही डोके आदळले तरी आपल्याला महाराष्ट्रात जागा मिळत नाहीत. म्हणून ते बँकॉकला निघून गेले आहेत. त्यांना राज्यात तोंड दाखवायलाही जागी उरली नसल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष खाली होण्याच्या मार्गावर आहे. मैदानात आता कोणी राहिले नाही. आमचे पैलवान तेल लावून आहेत. आता भारतीय जनता पक्षाला स्पर्धकच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.५० लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. पात्र शेतक-यांना जोपर्यंत लाभ मिळणार नाही, तोपर्यंत योजना सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडीने शेतक-यांना १५ वर्षांमध्ये २०  हजार कोटींचे अनुदान दिले. आम्ही पाच वर्षांत ५० हजार कोटींचे अनुदान शेतक-यांना दिले आहे. राज्यातील १४० प्रकल्पांचे कामे पाच वर्षांत पूर्णत्वास गेल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे व उमेदवार उपस्थित होते. ------------------तापी रिचार्जमुळे सिंचनाची सुविधाजिल्ह्यातील तापी मेघा रिचार्ज प्रकल्पासाठी सहा हजार कोटींच्या आराखड्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रकल्प समोर जाईल. यामुळे शेतक-यांना सिंचनाची मोठी सोय होणार आहे. खारपाणपट्ट्यालाही सिंचनाचा लाभ होणार असल्याचा उल्लेख करीत, दर्यापूर तालुक्यातील तब्बल 1700 शेततळी पूर्ण झाली आहेत; राज्यात दर्यापूर तालुक्याने रेकॉर्ड केला असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019