शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

अ‍ॅनालॉग सिग्नल बंदने गोंधळात गोंधळ

By admin | Updated: January 3, 2016 00:27 IST

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील केबल टिव्ही धारकांना सेट टॉप बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०१५ ही अंतिम मुदत होती.

डी-२ एचवर भर : ग्राहकांसह केबल आॅपरेटरची दाणादाण अमरावती : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील केबल टिव्ही धारकांना सेट टॉप बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०१५ ही अंतिम मुदत होती. ज्या केबल चालकांनी सेट टॉप बॉक्स बसविले नाहीत. त्यांची सेवा खंडित करण्यात आल्याने गोंधळात भर पडली आहे. ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजताच्या ठोक्यावर केबल चालकांचे अ‍ॅनालॉग सिग्नल बंद करण्यात आल्याने लक्षावधी घरातील टीव्ही संच शोपिस बनले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सेट टॉप बॉक्सच्या मागणीत भर पडली. टीव्हीचे केबल जोडणी बंद झाल्याने नागरिकांनी केबल आॅपरेटरकडे धाव घेतली. मात्र, मागणी आवाक्याबाहेर गेल्याने केबल आॅपरेटरचीसुध्दा मोठी दाणादाण उडाली आहे. यावर मात करण्यासाठी शहरातील अनेकांनी सेट टॉप बॉक्स लावून न घेता डि-२ एचला पसंती दिली आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रायलाच्या अधिसूचनेनुसार ३१ डिसेंबरपर्यंत बसविण्याचे आवाहन केले होते. मात्र, अनेक ठिकाणी संबंधित केबल सेवा पुरविणारी कंपनी, बहुविध यंत्रणा परिचालक (एसएमओ) आणि स्थानिक केबल परिचालक यांच्याद्वारे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. अशा केबल चालकांचे अ‍ॅनालॉग सिग्नल बंद करण्यात आले आहे. सेट टॉप बॉक्सच्या मागणीत भर अमरावती : टीव्ही डिजीटायझेशन टप्पा तीन अंतर्गत सेट टॉप बॉक्स बसविला नसेल अशा वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले. महसुल विभागाच्या कारवाईने टीव्हीवर संक्रांत आली असून केंद्र सरकारने पुन्हा मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने सेट टॉप बॉक्सच्या मागणीत भर पडली आहे. २८ लाख लोकसंख्या असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये केवळ ५७ हजार घरामध्ये केबल जोडणी होती. त्यापैकी ३१ डिसेंबर अखेर केवळ १८ हजार ७१२ ग्राहकांपर्यंतच सेटटॉप बॉक्स पोहचले आहेत. उल्लेखनीय म्हणजे संबधीत एसएमओ सेटटॉप बॉक्सचा पुरवठा वेळेत न करू शकल्याने जिल्ह्यातील लाखो दर्शकांना टीव्ही कार्यक्रमांपासून वंचित राहावे लागत आहे. (प्रतिनिधी)