शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

‘अमृत’च्या कंत्राटदाराला प्रतिदिन पाच हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:14 AM

अमरावती : शहरातील प्रत्येक नळ कनेक्शनधारकाला उच्चदाबाने पाणीपुरवठा व्हावा, शहरातील वाढलेल्या नवीन वस्तीतील नागरिकांना नळकनेक्शन मिळावे, याकरिता शहरासाठी ...

अमरावती : शहरातील प्रत्येक नळ कनेक्शनधारकाला उच्चदाबाने पाणीपुरवठा व्हावा, शहरातील वाढलेल्या नवीन वस्तीतील नागरिकांना नळकनेक्शन मिळावे, याकरिता शहरासाठी ९३ कोटींच्या निधीतून ‘अमृत’ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र, कंत्राटदाराने कामात दिरंगाई केल्याने ही योजना तीन वर्षांपासून रखडली आहे. अमृतच्या कंत्राटदाराला प्रतिदिन पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. सदर कंत्राटदाराकडून आतापर्यंत तीन कोटींचा दंड जीवन प्राधिकरणने वसूल केला आहे.

अमृत योजनेचे ७८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मजीप्राच्या अधिकाऱ्याने दिली. शहरात ऑक्टोबर २०१६ मध्ये सदर योजनेला मंजूरात मिळाली. ९३ कोटींच्या निधीची तरतूद होऊन हे काम नाशिक येथील एका कंपनीला मिळाले. काही दिवस काम सुरळीत झाले. मात्र, त्यानंतर कामात दिरंगाई व कामे मंदगतीने झाल्याचा कंपनीवर ठपका ठेण्यात आला. आधी प्रतिदिन हजारो रुपयांचा दंड आकारून त्या कंपनीच्या बिलातून तीन कोटींची वसुली मजीप्राने केली. मात्र, दंड हा नियमबाह्य वसूल केल्याचे सांगत पी.एल. आडके कंपनीने न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे जीवन प्राधिकरणने १ कोटी १४ लाख रुपये कंपनीला परत केले. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने योजनेचे काम थांबले आहे. ही योजना पूर्णत्वास जाण्यास आणखी किती कालावधी लागेल व शहरातील नवीन भागात राहण्यास गेलेल्या नागरिकांना ‘अमृत’ योजनेचे पाणी केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राजकीय पुढाऱ्यांनी सदर योजनेच्या कामाचा आढावा घेऊन सदर काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

पाणीशुद्धीकरण प्रकल्पाचे काम ५० टक्के

या योजनेतून ८० किमीची पाईपलाईन भूमिगत करण्यात आली. तसेच नऊ पिण्याच्या पाण्याच्या उंच टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तपोवन येथे ६१ दलघमी क्षमतेचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यापैकी ३०.५० दलघमीचे काम अर्धे झाले आहे. पण ३०.५० दलघमीचे काम अपूर्ण असल्याने ही योजना रखडली आहे. या योजनेला २ सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदत होती. परंतु कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे या योजनेचे काम लांबणीवर पडले आहे.

दोन कोट आहेत.