शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अमरावतीच्या मुलीचे आग्य्रातून अपहरण, मावशीच्या सुनेविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:05 IST

दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही.

ठळक मुद्देवडिलांची पोलीस उपायुक्तांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. त्यामुळे अखेर वडिलांनी सोमवारी पोलीस उपायुक्तांकडे दाद मागितली. त्यांनी राजापेठ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी अपहरणाचा गुन्हा नोंदविला.सिद्धार्थनगरातील रहिवासी एका ५० वर्षीय व्यक्तीची मुलगी दोन महिन्यांची असताना तिची आई सोडून गेली. आईने आग्रा येथील एका इसमाशी संसार थाटला. दरम्यान मुलीचे वडील बेलपुºयात भाड्याच्या खोली करून चौकीदाराची नोकरी करू लागले. बेलपुºयातच मुलीची मोठी मावशी राहत होती. आॅक्टोबर २०१८ मध्ये एके दिवशी मावशीची सून मुलीच्या घरी आली. आईची भेट करून देण्याचे सांगून तिने मुलीला आग्रा येथे नेले. त्यानंतर मावशीची सून तेथून परत अमरावतीत आली. दरम्यान दोन ते तीन महिने ती मुलगी आग्रा येथे आईकडे राहिली. त्यानंतर मावशीच्या सुनेने मुलीला आग्ºयाहून परत अमरावतीत आणले. १० जून रोजी मावशीच्या कोणालाही न सांगता त्या मुलीला पुन्हा आग्रा येथे नेले व तेथेच सोडून सून अमरावतीत परतली. दरम्यान मुलगी घरात नसल्याचे पाहून वडिलांनी शोधाशोध सुरू केली. त्यांनी मुलीबद्दल नातेवाईकांकडे चौकशी केली. राजापेठ पोलिसात तक्रार देण्यास गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही. त्यांनी मावशीच्या सुनेला चौकशीकरिता बोलाविले होते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आग्रा येथील नातेवाईकांशी संपर्क साधला. मुलीच्या आईच्या दुसºया पतीसोबत संपर्क साधून मुलीबाबत विचारणा केली. त्यावेळी धक्कादायक बाब पुढे आली. मुलगी तेथूनही बेपत्ता असल्याचे वडिलांना कळले. १५ जून २०१९ रोजी ती मुलगी आग्राहून बेपत्ता झाली. तिने रात्रीच्या वेळी घराचे दार बाहेरून बंद करून पलायन केले. यासंदर्भात आग्रा पोलिसांत तक्रार नोंदविल्याची माहिती तिच्या आईच्या दुसºया पतीने पोलिसांनाही दिली. या घडलेल्या प्रकारसंदर्भात मुलीचे वडील व आत्याने सोमवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यांनीही आग्रा येथील त्या व्यक्तीशी संपर्क साधून माहिती घेतली. या घटनेच्या अनुषंगाने डीसीपी सोळंके यांनी राजापेठचे प्रभारी ठाणेदार दिलीप चव्हाण यांना अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे सूचित केले. त्यानुसार मुलीचे वडील राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले. याप्रकरणात पोलिसांनी भावना नामक मावशीच्या सुनेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.भावना पतीसह पसारमुलीच्या मावशीची सून बेलपुऱ्यातील रहिवासी ठिकाणावरून पसार झाली आहे. राजापेठ पोलीस तिचा शोध घेत आहेत. मुलीला आग्रा पोहोचून देण्यात व तेथून परत आणण्यात भावनाने पुढाकार घेतला होता. तिच्या या पुढाकाराचे गुपित काय आहे, हे भावनाला अटक केल्यानंतर पुढे येईल.