शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

अमरावतीच्या मुलीचे आग्य्रातून अपहरण, मावशीच्या सुनेविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:05 IST

दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही.

ठळक मुद्देवडिलांची पोलीस उपायुक्तांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. त्यामुळे अखेर वडिलांनी सोमवारी पोलीस उपायुक्तांकडे दाद मागितली. त्यांनी राजापेठ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी अपहरणाचा गुन्हा नोंदविला.सिद्धार्थनगरातील रहिवासी एका ५० वर्षीय व्यक्तीची मुलगी दोन महिन्यांची असताना तिची आई सोडून गेली. आईने आग्रा येथील एका इसमाशी संसार थाटला. दरम्यान मुलीचे वडील बेलपुºयात भाड्याच्या खोली करून चौकीदाराची नोकरी करू लागले. बेलपुºयातच मुलीची मोठी मावशी राहत होती. आॅक्टोबर २०१८ मध्ये एके दिवशी मावशीची सून मुलीच्या घरी आली. आईची भेट करून देण्याचे सांगून तिने मुलीला आग्रा येथे नेले. त्यानंतर मावशीची सून तेथून परत अमरावतीत आली. दरम्यान दोन ते तीन महिने ती मुलगी आग्रा येथे आईकडे राहिली. त्यानंतर मावशीच्या सुनेने मुलीला आग्ºयाहून परत अमरावतीत आणले. १० जून रोजी मावशीच्या कोणालाही न सांगता त्या मुलीला पुन्हा आग्रा येथे नेले व तेथेच सोडून सून अमरावतीत परतली. दरम्यान मुलगी घरात नसल्याचे पाहून वडिलांनी शोधाशोध सुरू केली. त्यांनी मुलीबद्दल नातेवाईकांकडे चौकशी केली. राजापेठ पोलिसात तक्रार देण्यास गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही. त्यांनी मावशीच्या सुनेला चौकशीकरिता बोलाविले होते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आग्रा येथील नातेवाईकांशी संपर्क साधला. मुलीच्या आईच्या दुसºया पतीसोबत संपर्क साधून मुलीबाबत विचारणा केली. त्यावेळी धक्कादायक बाब पुढे आली. मुलगी तेथूनही बेपत्ता असल्याचे वडिलांना कळले. १५ जून २०१९ रोजी ती मुलगी आग्राहून बेपत्ता झाली. तिने रात्रीच्या वेळी घराचे दार बाहेरून बंद करून पलायन केले. यासंदर्भात आग्रा पोलिसांत तक्रार नोंदविल्याची माहिती तिच्या आईच्या दुसºया पतीने पोलिसांनाही दिली. या घडलेल्या प्रकारसंदर्भात मुलीचे वडील व आत्याने सोमवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यांनीही आग्रा येथील त्या व्यक्तीशी संपर्क साधून माहिती घेतली. या घटनेच्या अनुषंगाने डीसीपी सोळंके यांनी राजापेठचे प्रभारी ठाणेदार दिलीप चव्हाण यांना अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे सूचित केले. त्यानुसार मुलीचे वडील राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले. याप्रकरणात पोलिसांनी भावना नामक मावशीच्या सुनेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.भावना पतीसह पसारमुलीच्या मावशीची सून बेलपुऱ्यातील रहिवासी ठिकाणावरून पसार झाली आहे. राजापेठ पोलीस तिचा शोध घेत आहेत. मुलीला आग्रा पोहोचून देण्यात व तेथून परत आणण्यात भावनाने पुढाकार घेतला होता. तिच्या या पुढाकाराचे गुपित काय आहे, हे भावनाला अटक केल्यानंतर पुढे येईल.