शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अमरावतीत कर्जमाफीच्या याद्या अपलोड, प्रसिद्धीची प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 16:36 IST

आयटी विभागाच्या नव्या सॉफ्टवेअरनुसार जिल्ह्यातील कर्जदार एक लाख चार हजार शेतक-यांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

गजानन मोहोड/अमरावती- आयटी विभागाच्या नव्या सॉफ्टवेअरनुसार जिल्ह्यातील कर्जदार एक लाख चार हजार शेतक-यांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे शेतक-यांना तात्पुरत्या पात्र स्वरूपातील याद्या प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील ७४९ सोसायटी व बँक शाखांच्या याद्या अपलोड करताना सहकार विभागाची चांगलीच दमछाक झाली आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या नावाच्या याद्या अपडेशनचे काम सहकार विभाग व जिल्हा बँकेद्वारा युद्धपातळीवर सुरू होते. यामध्ये शासन निकषानुसार पहिल्या टप्प्यात बँकांचे थकबाकीदार शेतक-यांमधून निकषपात्र लाभार्थी, दुस-या टप्प्यात पडताळणी करून निकषपात्र लाभार्थ्यांची यादी अपलोड करणे, तर तिस-या टप्प्यात सहकारी संस्थांसह इतर पदाधिकारी वगळून त्यांची नावे अपात्रतेच्या यादीत समाविष्ट करणे आदी प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती. जिल्हा उपनिबंधकांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ६६९ सेवा सहकारी सोसायटीज व जिल्हा बँकेच्या ८० शाखा अशा एकूण ७४९ संस्थांच्या पात्र एक लाख चार हजार २१८ लाभार्थ्यांच्या याद्या शनिवारी उशिरापर्यंत शासनाच्या आयटी विभागाकडे अपलोड करण्यात आल्या आहेत. 

राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्या त्या- त्या शाखांच्या मुख्य कार्यालयाद्वारा अपलोड करण्याची प्रक्रिया अखेरच्या चरणार आहे. याची एकीकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, सहकार विभागाची प्रक्रिया आटोपली असून व्यापारी बँकांची प्रक्रिया एक वा दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर एका आठवड्याच्या अवधीत तात्पुरत्या पात्र शेतक-यांची यादी आयटी विभागाद्वारा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गावनिहाय याद्या अपलोड करून सहकार विभाग व तालुकास्तरीय समिती या यादीची पडताळणी करणार आहे. शासनाच्या या घोळात शेतक-यांना मात्र नाहक प्रतीक्ष करावी लागत आहे.

कर्जमाफीच्या प्रमाणपत्रानंतरही रक्कम जमा नाहीशासनाने दिवाळीच्या आदल्या दिवसी जिल्ह्यातील ३२ शेतक-यांना जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांचे हस्ते व एका शेतकºयाला मुंबईला मुख्यमंत्र्याचे हस्ते गौरविण्यात आले व त्यांना कर्जमाफ झाल्याविषयीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र प्रसिद्ध २३६ लाभार्थ्यांच्या हिरव्या यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांचे कर्ज अद्यापही माफ झालेले नाहीत. त्या यादीतील ग्रामीण बँकेच्या शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी ४१ लाखांचा निधी जमा झालेला आहे. मात्र जिल्हा बँकेच्या खातेदारांच्या कर्जखात्यात पैसे मात्र अद्यापही जमा झाले नसल्यामुळे त्यांची कर्जमाफी झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या ८० शाखा व ६६९ सेवा सहकारी सोसायटींच्या एक लाख चार हजार २१८ शेतक-यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या पात्र शेतक-यांच्या यादीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर तालुका समिती पडताळणी करेल.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक 

टॅग्स :Farmerशेतकरी