शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती

By गणेश वासनिक | Updated: May 22, 2023 17:18 IST

व्यवस्थापन परिषदेचा निर्णय, महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त शिक्षक अनिवार्य

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यात येणार आहे. या विषयाला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले असून, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यात विद्यापीठ परिसरात ३४ पदव्युत्तर विभाग आहेत. या विभागामध्ये १२२ शिक्षकांची संख्या शासनाने मंजूर केली आहे. परंतु यापैकी ६९ शिक्षक सेवानिवृत्त झाले असून ५३ इतक्या शिक्षकांच्या भरवश्यावर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग सुरु आहे. यासोबतच अंशदायी शिक्षकांना शिकविण्याकरीता लावले जातात. परंतु शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार व संशोधनपूर्ण शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, याकरीता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम १०३ अन्वये विद्यापीठ परिसरातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त शिक्षक विद्यापीठाशी संलग्नित ४०५ महाविद्यालये आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात, त्याठिकाणी सदर अभ्यासक्रमाकरीता कमीतकमी एक पदव्युत्तर विद्यापीठ मान्यताप्राप्त नियमित शिक्षक असला पाहिजे, असा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. संलग्नित महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्रयत्नशील आहेत, तसा पुढाकार सुद्धा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रापासून संलग्नित महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता कमीतकमी एक विद्यापीठ मान्यताप्राप्त नियमित शिक्षक महाविद्यालयाने भरणे आवश्यक आहे. या संदर्भात लवकरच विद्याशाखांचे अधिष्ठाता नियमावली तयार करणार आहे.

पदव्युत्तर शैक्षणिक विभाग स्वायत्त होणार

विद्यापीठ परिसरामध्ये ३४ पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आहेत. या शैक्षणिक विभागांना स्वायत्तता मिळावी, त्या विभागांचा विकास व्हावा, संशोधनाचा दर्जा वाढावा, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि दर्जेदार विद्यार्थी तयार व्हावेत, या उद्देशाने शैक्षणिक विभागांना स्वायत्तता देण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या सभेत विचारविमर्श करण्यात आला. शैक्षणिक स्वायत्ततेबाबतचे नियमावली तयार करून ते अधिष्ठाता मंडळ व त्यानंतर विद्वत परिषदेसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकuniversityविद्यापीठAmravatiअमरावती