शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती

By गणेश वासनिक | Updated: May 22, 2023 17:18 IST

व्यवस्थापन परिषदेचा निर्णय, महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त शिक्षक अनिवार्य

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यात येणार आहे. या विषयाला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले असून, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यात विद्यापीठ परिसरात ३४ पदव्युत्तर विभाग आहेत. या विभागामध्ये १२२ शिक्षकांची संख्या शासनाने मंजूर केली आहे. परंतु यापैकी ६९ शिक्षक सेवानिवृत्त झाले असून ५३ इतक्या शिक्षकांच्या भरवश्यावर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग सुरु आहे. यासोबतच अंशदायी शिक्षकांना शिकविण्याकरीता लावले जातात. परंतु शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार व संशोधनपूर्ण शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, याकरीता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम १०३ अन्वये विद्यापीठ परिसरातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त शिक्षक विद्यापीठाशी संलग्नित ४०५ महाविद्यालये आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात, त्याठिकाणी सदर अभ्यासक्रमाकरीता कमीतकमी एक पदव्युत्तर विद्यापीठ मान्यताप्राप्त नियमित शिक्षक असला पाहिजे, असा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. संलग्नित महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्रयत्नशील आहेत, तसा पुढाकार सुद्धा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रापासून संलग्नित महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता कमीतकमी एक विद्यापीठ मान्यताप्राप्त नियमित शिक्षक महाविद्यालयाने भरणे आवश्यक आहे. या संदर्भात लवकरच विद्याशाखांचे अधिष्ठाता नियमावली तयार करणार आहे.

पदव्युत्तर शैक्षणिक विभाग स्वायत्त होणार

विद्यापीठ परिसरामध्ये ३४ पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आहेत. या शैक्षणिक विभागांना स्वायत्तता मिळावी, त्या विभागांचा विकास व्हावा, संशोधनाचा दर्जा वाढावा, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि दर्जेदार विद्यार्थी तयार व्हावेत, या उद्देशाने शैक्षणिक विभागांना स्वायत्तता देण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या सभेत विचारविमर्श करण्यात आला. शैक्षणिक स्वायत्ततेबाबतचे नियमावली तयार करून ते अधिष्ठाता मंडळ व त्यानंतर विद्वत परिषदेसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकuniversityविद्यापीठAmravatiअमरावती