शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

अमरावती पोलिसांचे ‘मिशन कॉर्नर मीटिंग्ज’ हिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

‘कॉर्नर मीटिंग्ज’मधील परिणामकारक समुपदेशन व मार्गदर्शनामुळे शहरातील ‘टेन्स’ हळूहळू नाहीसा होऊन शहर पूर्वपदावर येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शहरातील जातीय सलोखा अधिक बळकट करण्यासाठी ‘मिशन सर्वधर्म समभाव‘ हाती घेतले. त्याअंतर्गत शहरातील अतिसंवेदनशील व संवेदनशील भागात कॉर्नर मीटिंग्ज घेतल्या जात आहेत. त्या छोटेखानी बैठकीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: शुक्रवार व शनिवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले. अखेर संचारबंदी व इंटरनेट बंदी लागू करावी लागली. मात्र, त्यानंतरही दोन समुदाय आमनेसामने उभे ठाकल्याचे दृश्य दिसले. त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून हिंदू मुस्लिमबहुल परिसरात ‘मिशन कॉर्नर मीटिंग्ज’ राबविण्यात आले. हेल्पलाईनदेखील मदतीला धावली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. ‘कॉर्नर मीटिंग्ज’मधील परिणामकारक समुपदेशन व मार्गदर्शनामुळे शहरातील ‘टेन्स’ हळूहळू नाहीसा होऊन शहर पूर्वपदावर येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शहरातील जातीय सलोखा अधिक बळकट करण्यासाठी ‘मिशन सर्वधर्म समभाव‘ हाती घेतले. त्याअंतर्गत शहरातील अतिसंवेदनशील व संवेदनशील भागात कॉर्नर मीटिंग्ज घेतल्या जात आहेत. त्या छोटेखानी बैठकीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यातील दोन्ही समुदायातील उपस्थितांच्या संख्येने त्यावरील यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले आहे. पोलीस आयुक्तांसह उपायुक्त विक्रम साळी व एम.एम. मकानदार तथा सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड व पूनम पाटील ही मंडळी ज्या भागात हिंसाचार झाला, अशा भागात रात्रीच्या वेळी छोटेखानी सभा घेत आहेत. हनुमाननगर परिसरात दोन समुदाय आमनेसामने ठाकले होते. त्या ठिकाणी बैठक घेण्यात आली. त्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांची एकत्रित उपस्थिती शहर शांततेकडे वाटचाल करीत असल्याची नांदी ठरली आहे. यात हेल्पलाईनची मदत मिळत आहे.

घराच्या आत राहा, अन्यथा फौजदारीचा बडगाअनेक ठिकाणी ‘ठोशास ठोसा’ म्हणून लोक आमनसामने आले. संचारबंदीच्या काळात कोणत्याही समुदायाने, जमावाने अमोरासमोर उभे ठाकू नये, घरातच राहावे, अन्यथा फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा तंबी वजा इशारादेखील बैठकांमधून खाकीकडून दिली जात आहे. तेवढ्याच प्राधान्याने तरुणाईला दंगल, त्यानंतर दाखल गुन्ह्यांची माहितीदेखील दिली जात आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस