शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Amravati: "आमची युती सेनेशी, २४-२४ चा फॉर्म्यूला ठरला", प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

By उज्वल भालेकर | Updated: January 6, 2024 18:23 IST

Prakash Ambedkar: आमची जी काही बोलणी सुरू आहे ती फक्त सेनेशी सुरू आहे आणि सेना आम्हाला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत सहभागी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी करत आहे. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नसल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी दिली.

- उज्वल भालेकरअमरावती  - आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्या सेनेशी झाली आहे. आमचा २४-२४ सीटचा फॉर्म्यूला ठरला आहे. त्यामुळे आमची जी काही बोलणी सुरू आहे ती फक्त सेनेशी सुरू आहे आणि सेना आम्हाला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत सहभागी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी करत आहे. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नसल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० जानेवारी रोजी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे शनिवारी अमरावती शहरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सत्तेपासून रोखण्याचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढविणे गरजेचे आहे; परंतु काँग्रेसची भूमिका ही दुटप्पी आहे, त्यामुळे त्यासंदर्भात जास्त काही बोलणार नाही. आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी झालेली आहे. त्यामुळे आमचे जे काही बोलणे आहे ते फक्त शिवसेनेशी आहे.

आम्ही इंडिया आघाडीत जायला तयार आहोत. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तो प्रस्ताव अजूनही स्वीकारलेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. ते म्हणाले निवडणूक आयोगाची संविधानिक जबाबदारी ही निवडणुका घेणे ही आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने नि:पक्षपातीपणे आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे. जर निवडणूक आयोग आपली जबाबदारी पार पाडत नसेल, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा लोकांनी निवडणूक आयोगाला बदडून काढावे असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी